
Tej Police Times
करोनाकाळात त्या-त्या शाळांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. मात्र आता दोन वर्षांच्या कालावधीनंतर, दहावी आणि बारावीची परीक्षा पूर्वीप्रमाणे वेगवेगळ्या केंद्रांवर घेतली जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत होत आहे. १७३ केंद्रांवर ही परीक्षा होणार असून परीक्षेसाठी एक लाख चार हजार ५६१ विद्यार्थी बसले आहेत. माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (दहावी) परीक्षा २ ते २५ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. दहावीची परीक्षा ३३२ केंद्रांवर होणार असून एक लाख १६ हजार ५४२ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.
SSC HSC Exam: दहावी, बारावीतील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक शंकेचे होणार निरसण, ‘या’ क्रमांकांवर साधा संपर्क
या परीक्षा कालावधीत परीक्षा केद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारच्या विविध विभागांच्या समन्वयातून ‘कॉपीमुक्त अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ नयेत, याबाबत विद्यार्थी, पालक, शिक्षक, संस्थाचालक यांचे उद्बोधन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चार भरारी पथक नेमण्यात आली आहेत. याशिवाय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकानिहाय भरारी पथकेदेखील स्थापन करण्यात आली आहेत.
कालावधी २ ते २५ मार्च २०२३
एकूण परीक्षार्थी १ लाख १६ हजार ५४२
एकूण केंद्रे ३३२
कालावदी २१ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२३
एकूण परीक्षार्थी १ लाख ०४ हजार ५६१
एकूण केंद्रे १७३
HSC Exam: उद्यापासून बारावीची परीक्षा, विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेबद्दल जाणून घ्या
HSC Exam: बारावी परीक्षा उद्यापासून; परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू, उल्लंघन केल्यास होणार मोठी कारवाई
Recover your password.
A password will be e-mailed to you.