Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

HSC Exam:विद्यार्थ्यांची अजबच तऱ्हा; फोन करुनही बोर्डाच्या परीक्षेला येईनात, कॉपीमुक्त अभियानाचा घेतला धसका

5

जालना: राज्यात सध्या बारावीच्या परीक्षेची धूम सुरु आहे. परीक्षा सुरळीत पार पाडाव्यात यासाठी महाराष्ट्र बोर्डाने जोरदार तयारी केली आहे. यंदा कॉपीमुक्त परीक्षेसाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जालन्यातही शिक्षण विभागाबरोबरच जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासन कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रयत्न करून परीक्षा केंद्रांवर भेटी देत आहेत. बारावीच्या पहिल्या पेपरच्या वेळेस जालन्याचे जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड यांनी कॉपी करताना १६ विद्यार्थ्यांना रंगेहाथ पकडलं. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरलंय. त्याचा परीणाम आजच्या हिंदीच्या पेपरवर झालेला दिसून आला.

आज जालन्यातील जामवाडी येथील रंगनाथराव पाटील परीक्षा केंद्रावर हिंदी विषयाच्या परीक्षेसाठी एकही विद्यार्थी फिरकला नाही.त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोलीस, केंद्रप्रमुख यांच्यासह सर्वांना ताटकळत बसावं लागलं.

आज बारावीचा हिंदी विषयाचा पेपर होता. या परीक्षा केंद्रावर हिंदी हा विषय दोनच विद्यार्थ्यांनी घेतलेला होता. मात्र केंद्रप्रमुखांनी दोन्हीही विद्यार्थ्यांना फोन लावून परिक्षेला बोलावले तरीही विद्यार्थी परीक्षेसाठी आले नाहीत.त्यामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा वेळेत शुकशुकाट पाहायला मिळाला. एकही विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षेसाठी न आल्यानं शिक्षकांना देखील पेपर न घेताच रिकाम्या हातानं परीक्षा केंद्रावरून मागे परतावं लागलं. अशी प्रतिक्रिया जामवाडी परिक्षा केंद्रातील परीक्षा पर्यवेक्षक एम.एस.लहांडगे यांनी दिली.

HSC Exam: राज्यातल्या ९ विभागात बारावीच्या परीक्षेला सुरुवात, जाणून घ्या महत्वाचे मुद्दे

हिंदी प्रश्नपत्रिकेत चूक

बारावीच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषयाची प्रश्नपत्रिका हाती आली. हिंदी विषयाच्या या प्रश्नपत्रिकेत दोन प्रश्नांमध्ये उपप्रश्न क्रमांक चुकीचे देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आले. नेमका उपप्रश्न क्रमांक काय टाकायचा?असा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला. बोर्डाकडून बरेच दिवस आधीपासून बारावी परीक्षांची तयारी सुरु होते. असे असताना या चुका वारंवार का होतात? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हिंदीच्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न क्रमांक दोनमध्ये चार शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे होते. या शब्दांचे क्रमांक १,२,३,४ असे असणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात मात्र १,२,१,२ असे क्रमांक देण्यात आले. एवढंच नव्हे तर समानार्थी शब्द लिहिण्यासाठी प्रश्नामध्ये देखील घोळ पाहायला मिळाला. येथे दिलेल्या चारही शब्दांना देखील १,२,३,४ असे प्रश्न क्रमांक अपेक्षित असताना त्याऐवजी १,१,१,१ हे प्रश्न क्रमांक देण्यात आले होते.

SSC HSC Exam: ‘कॉपीमुक्ती’साठी भरारी पथक सज्ज

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.