
Tej Police Times
जळगाव: शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यात उद्या साेमवारपासून पुढील ४ दिवस अवकाळी पावसाचे सावट राहणार आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.समुद्र किनारपट्टीवर वाढत्या तापमानात आर्द्रतेमुळे उकाडा असह्य झाल्याने मुंबई ते केरळपर्यंत उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. दुसरीकडे उर्वरित महाराष्ट्रात साेमवारपासून अवकाळी पावसाचे सावट असल्याने काहीशा ढगाळ वातावरणात कमाल आणि किमान तापमानात घट झालेली आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.