Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवरदेव बैलगाडीतून नवरीच्या घरी, ऊंट घोड्यावरुन वऱ्हाडी, अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा

20

जयपूर : मार्च संपून एप्रिल महिना सुरु झाला आहे, देशभरात लग्नाचा हंगाम सुरु आहे. विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीनं लग्न सोहळे आयोजित केले जात आहेत. काही ठिकाणी नवरदेव हेलिकॉप्टरमधून लग्नाला दाखल होत असल्याचं पाहायला मिळतं. दुसरीकडे महागड्या अलिशान गाड्यातून वऱ्हाडी दाखल होतात. मात्र, राजस्थानच्या दौसा शहरात एका लग्नाची चर्चा सुरु आहे. या लग्नासाठी वऱ्हाडी बैलगाडीतून नवरीच्या घरी पोहोचले. रस्त्यानं जाणाऱ्या वऱ्हाडाला पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याकडेला मोठी गर्दी केली होती.

नवरदेवाचे वडील प्रल्हाद मीणा हे गुजरातच्या अहमदाबादमध्ये व्यवसाय करतात. त्यामुळं नवरीच्या कुटुंबाला वरपक्षाचं वऱ्हाड अलिशान गाड्यामधून पोहोचेल, अशी अपेक्षा होती. मात्र, बैलगाडी वऱ्हाडी पोहोचली आणि सगळेच पाहत राहिले.

रामगडच्या पचवारा येथील अमराबादचे रहिवासी भामाशाह प्रल्हाद मीणा यांनी त्यांचा मुलगा विनोद याच्या लग्नाचं वऱ्हाड बैलगाडी, ऊंट आणि घोड्यांवरुन नेलं. राजस्थानातील दौसामध्ये या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहेत. आधुनिक काळाती दिखाव्यापासून दूर राहत पारंपारिक पद्धतीनं बैलगाडीतून वऱ्हाडी पोहोचले. वरातीसाठी ऊंट आणि बैलांना देखील सजवण्यात आलं होतं.

शिवरायांचा अवमान झाला तेव्हा मूग गिळले होते की दातखीळ बसली होती? अजितदादा ऑन फायर

ना राडा, ना गोंधळ; गौतमीचा कार्यक्रम पहिल्यांदाच शांततेत पार पडला; गावाचं परफेक्ट नियोजन

रस्त्यानं वऱ्हाडी निघाले असताना ग्रामीण भागातील लोक पाहत होते. आठ ऊंटगाड्या, ७ बैलगाड्या, १० ऊंट, १० घोड्यांवरुन वऱ्हाडी नवरी मुलीच्या घरी पोहोचले. पारंपारिक पद्धतीनं निघालेली वरात पाहायला गावोगावी लोक जमले होते. नवरदेव बैलगाडीतून नवरीच्या घरी पोहोचला. अमराबाद ते रायमलपूरा येथे पोहोचायला तीन तास लागले. सोबत डीजे देखील वाजत होता आणि वऱ्हाडी नाचत होते.

एका नारळावर आणि एका रुपयावर हे लग्न पार पडलं. नवरदेवाकडील मंडळी दाग दागिन्यांसह लग्नाला पोहोचले होते. समाजात हुंड्याचा मोठा प्रश्न आहे. ही प्रथा तोडण्याचं काम केल्याचं विनोद म्हणाला.

काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटले म्हणता, मिंधेंसह नितीशकुमारांचं तुम्ही काय चाटलं? ठाकरेंचा थेट शाहांना सवाल

परंपरा कायम ठेवली

प्रल्हाद मीणा यांनी त्यांचं कुटुंब शेतकरी पार्श्वभूमीचं असल्याचं म्हटलं. शेतकऱ्यांना प्राण्यांचं महत्व असतं. पहिल्यावेळी बैलगाडीनं वराती यायच्या आता सगळं बदललं आहे. त्यामुळं जुन्या परंपरा तरुणांमध्ये नेण्याचा प्रयत्न केल्याचं म्हटलं. नवरीनं देखील पूर्वीच्या काळी लग्नात वऱ्हाडी बैलगाडीनं यायचे. यावेळी देखील वऱ्हाडी बैलगाडीनं आल्यानं आनंद झाल्याचं म्हटलं.

इजा, बिजा अन् तिजा… रोहित शर्माला झालंय तरी काय, मैदानात भडकला पण काय उपयोग झाला…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.