Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सूर्यग्रहणावेळी गर्भवती महिलांनी घ्यावयाची काळजी

18

गुरुवार २० एप्रिल रोजी सूर्यग्रहण सकाळी ७ वाजून ४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी संपेल. सूर्यग्रहणाचा खग्रास ८.७ मिनिटांनी होईल. या सूर्यग्रहणाचा एकूण कालावधी ५ तास २४ मिनिटे असेल. ग्रहणाच्या वेळी, सूर्य त्याच्या उच्च राशीत मेष राशीत असेल, जेथे बुध आणि राहू देखील त्याच्याबरोबर असतील. त्याच वेळी, या ग्रहणानंतर केवळ दोन दिवसांनी गुरुची राशी बदलणार आहे. अशा स्थितीत वर्षातील पहिले सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे या ग्रहणाचा सुतक काळ मानला जाणार नाही. परंतू यादरम्यान गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी जाणून घेऊया.Solar Eclipse: अमावस्येला वर्षातील पहिले सूर्यग्रहण; जाणून घ्या वेळ, प्रभाव आणि पौराणिक कथा

ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही त्याबाबत भारतीय समाजात अनेक समज गैरसमज आहेत. प्रामुख्याने गरोदर महिलांना ग्रहणाच्या काळात अधिक सांभाळलं जातं. त्यांची विशेष काळजी घेतली जाते. ग्रहणाचा बाळाच्या वाढीवर काही घातक परिणाम होतो. गरोदर महिला ग्रहणात बाहेर पडली तर तिच्या बाळामध्ये दोष निर्माण होतो. ग्रहणामुळे गर्भावर विपरित परिणाम झाल्याची घटना कुठे नोंद नाही परंतु विशेष काळजी घेण्याचं सांगितलं जातं.

या ग्रहणाच्या काळात गरोदर महिला, नवजात बालकं आणि नवमातांची विशेष काळजी घेतली जाते. एकूणच अनेक लोकं ग्रहणाचा काळ हा अशुभ मानतात. त्यावेळेत शुभ कार्य टाळली जातात. सूर्यग्रहण ही अवकाशात घडणारी एक नैसर्गिक स्थिती आहे. त्याचा बाळावर परिणाम होण्याची थेट शक्यता नसते. मात्र काहींच्या मते त्यामुळे गर्भात दोष निर्माण होतात.

एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण; ‘या’ ७ राशीच्या लोकांनी जरा सांभाळून, होईल मानसिक गोंधळ

ग्रहणाच्या काळात महिलांनी घरीच रहावं. या काळात नामस्मरण करावं, बाहेर पडल्यास किंवा कामं केल्यास बाळात दोष निर्माण होतात अशी धारणा आहे.
ग्रहण थेट डोळ्यांनी कोणीच बघू नये. मात्र पुरेशी काळजी घेऊन ग्रहण पाहता येऊ शकतं, सुरक्षेचे उपाय न घेता ग्रहण पाहिल्यास डोळ्यांचे नुकसान होऊ शकते. यावर्षीचे ग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे ही विशेष काळजी घेणे आवश्यक नाही. तसेच ग्रहणाच्या काळात सुतक पाळले जाते परंतु ज्या ठिकाणी ग्रहण दिसते त्या ठिकाणी सुतकाच्या नियमांचे पालन केले जाते या वर्षी भारतातून ग्रहण दिसणार नसल्यामुळे वेधादि नियम पाळले नाही तरी चालते असे सांगितले जाते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.