
Tej Police Times
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूचीही पूजा करावी. असे केल्यानेही लक्ष्मी प्रसन्न होते आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी आशीर्वाद देते. लक्ष्मी मातेच्या कृपेने तुमच्या घरात कधीही धन-समृद्धीची कमतरता भासत नाही. यासोबतच या दिवशी गणपतीचीही पूजा करावी. या दिवशी लक्ष्मीला मखाण्याची खीर नैवेद्य म्हणून दाखवल्यास तुमच्या घरातील संपत्ती वाढते असे सांगितले जाते.
अक्षय्य तृतीयेला जव खरेदी करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. जव दान करणे हे सोनं दान करण्यासारखे पुण्य देते. अक्षय्य तृतीयेला सोने खरेदीबरोबरच जव खरेदी करा. असे केल्याने तुमची संपत्ती वाढेल आणि लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. जर तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल, तर तुम्ही त्याऐवजी चांदी खरेदी करू शकता किंवा जव दान करू शकता.
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पाण्याने भरलेले मडके दान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सर्व प्रथम माठ किंवा रांजण घ्या आणि स्वच्छ पाण्याने भरा आणि त्यात थोडे गंगाजल मिसळा आणि ते एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला द्या किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी हा माठ किंवा रांजण ठेऊ शकता जेणेकरून गरजू तेथे येऊन पाणी पिऊ शकतात, तहानलेल्याची तहान भागू शकते. असे केल्याने पुण्याची प्राप्ती होते.
पौराणिक मान्यतेनुसार, ब्रह्मदेवाचा मुलगा अक्षय कुमारचा जन्म वैशाख महिन्यातील शुक्ल तृतीयेला झाला होता, म्हणून या दिवसाला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी पितरांना पिंडदान अर्पण केल्याने खूप शुभ फळ मिळते आणि अक्षय फळ मिळते. असे केल्याने तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुम्हाला सदैव सुखी राहण्याचा आशीर्वाद देतात.
तुमच्या घरात दीर्घकाळ आर्थिक संकट असेल तर अक्षय्य तृतीयेला या वस्तूंचे दान करावे. यामध्ये पाणी, मडकं, साखर, सत्तू, पंखा, छत्री, फळे इत्यादी गोष्टींचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, अक्षय्य तृतीयेला जे लोक या वस्तूंचे दान करतात, त्यांच्या घरी लक्ष्मीचा वास कायम राहतो आणि आर्थिक अडचणी दूर होतात.
टीप :ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.