Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दोन महिन्यांत अभ्यास कसा करायचा?, ‘आयडॉल’च्या विद्यार्थ्यांसमोर प्रश्न

7

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेने (आयडॉल) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाची तिसऱ्या सत्राची परीक्षा होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच चौथ्या सत्राची परीक्षा जाहीर केली आहे. एमए चौथ्या सत्राची परीक्षा विद्यापीठाकडून ६ जूनपासून घेतली जाणार आहे. मात्र १० एप्रिलला तिसऱ्या सत्राची परीक्षा संपलेली असताना केवळ दोन महिन्यांहून कमी कालावधीत अभ्यास पूर्ण करून चौथ्या सत्राची परीक्षा कशी द्यायची, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

आयडॉल एमए अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या सत्राची परीक्षा १० एप्रिलला संपली. बहुतांश विद्यार्थी काम करून शिकत असल्याने त्यांनी एप्रिलमध्ये परीक्षेसाठी सुट्ट्या घेतल्या होत्या. आता पुढील परीक्षेला तीन ते चार महिन्यांचा कालावधी असल्याने विद्यार्थ्यांनी त्यानुसार सुट्ट्यांचे नियोजन केले होते. काही विद्यार्थ्यांनी घरगुती कार्यक्रमांनिमित्त मे महिन्यात कार्यालयातून सुट्ट्या घेतल्या आहेत. काहींनी उन्हाळी सुट्ट्यांनिमित्त कुटुंबासह बाहेरगावी फिरण्याचे बेत आखले आहेत. मात्र विद्यापीठाने मागील परीक्षा संपताच दोन महिन्यांच्या आत पुढील सत्राची परीक्षा जाहीर केल्याने विद्यार्थ्यांचे नियोजन बिघडले आहे.

‘घरातील कार्य मे महिन्यात नियोजित होते. त्यामध्ये किमान पंधरा दिवसांचा कालावधी जाणार आहे. त्यासाठी कार्यालयातूनही सुट्टी घेतली आहे. आता विद्यापीठाने जूनमध्ये परीक्षा जाहीर केली आहे. परीक्षेला केवळ सव्वा ते दीड महिना उरला आहे. इतक्या कमी कालावधीत पूर्ण सत्राचा अभ्यास करून परीक्षा देणे शक्य नाही. आधीच मे महिन्यात घरगुती कार्यासाठी सुट्ट्या घेतल्या आहेत, त्यात अभ्यासासाठी पुन्हा सुट्ट्या घेता येणार नाहीत. त्यातून जूनमध्ये परीक्षा पार पडल्यास त्याचा निकालावर परिणाम होईल’, अशी भीती ऑयडॉलच्या एमए अभ्यासक्रमाला शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने व्यक्त केली.

विद्यापीठाने वेळापत्रक पूर्ण करायचे आहे म्हणून विद्यार्थ्यांवर परीक्षा लादू नयेत. केवळ दीड महिन्यात विद्यार्थ्यांचा संपूर्ण सत्राचा अभ्यास पूर्ण होणे शक्य नाही. ही मुले नोकरी करून शिक्षण घेतात. उन्हाळ्यात त्यांचे वेगळे नियोजन असते. मात्र विद्यापीठाने त्यांच्या सोयीने निर्णय घेतल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करून परीक्षा पुढे ढकलाव्यात, अशी मागणी माजी अधिसभा सदस्य सुधाकर तांबोळी यांनी केली.

CET Cell: एकाच दिवशी दोन परीक्षा, विद्यार्थ्यांची होणार गैरसोय

‘निकाल ऑगस्टपूर्वी लावणे आवश्यक’

‘विद्यापीठाचे सत्र उशिरा सुरू झाले. त्यातून परीक्षांना विलंब झाला आहे. आता विद्यापीठाच्या नियमित अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. त्यांच्याबरोबर विद्यापीठाला आयडॉलची परीक्षा घेणे सोयीस्कर होणार आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागते. त्यामुळे परीक्षा वेळेवर घेऊन त्यांचा निकाल ऑगस्टपूर्वी लावणे आवश्यक आहे. त्यानुसार विद्यापीठाने या परीक्षा जूनमध्ये घेण्याचे नियोजन केले आहे’, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सापडेनात, निकाल कसा लावणार?
धक्कादायक! मुंबई विद्यापीठाच्या दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना शून्य गुण

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.