
Tej Police Times
वाचा:राज्याचा गाडा हाकणाऱ्या मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच
मंत्रालयाची इमारत सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशी आहे. राज्याच्या प्रशासनाचा गाडा याच इमारतीतून हाकला जातो. या इमारतीत जायचे असल्यास सुरक्षेचे सर्व नियम काटेकोरपणे पाळावे लागतात. असे असताना याच इमारतीत दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळल्याने आज एकच खळबळ उडाली. मंत्रालयातील उपहारगृह परिसरात या दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. त्यामुळे सारेच चक्रावून गेले आहेत. या बाटल्या इथवर कशा पोहचल्या?, उपहारगृह परिसरात दारूची पार्टी झाली का?, यामागे नेमकं कोण आहे?, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले असून सरकारने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा, याची चौकशी करण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने तातडीने जारी केले आहेत.
वाचा:करोना: अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६६ हजारांवर; राज्याला हा मोठा दिलासा
प्रवीण दरेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
मंत्रालयात दारूच्या बाटल्यांचा खच आढळल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने त्यावरून सरकारला जाब विचारला. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले. या गंभीर प्रकरणाची अप्पर मुख्य सचिव (गृह) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून १५ दिवसांच्या आत उच्चस्तरिय चौकशी करण्याची मागणी दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो तेथे जर सर्वसामान्यांना प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. मात्र मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारूच्या बाटल्या आत आल्याच कशा, असा सवाल उपस्थित करताना दारूच्या बाटल्या मंत्रालयामध्ये मिळणे ही दुर्दैवी, चीड आणणारी व महाराष्ट्रातील परंपरांना काळीमा फासणारी घटना आहे, असे दरेकर यांनी नमूद केले आहे.
वाचा: भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी आणखी एक नाव चर्चेत; ‘ही’ आहेत बलस्थाने
Recover your password.
A password will be e-mailed to you.