
Tej Police Times
वाचा: हे उलटंच झालं! पोलीस अधिकारीच निघाला वाळू तस्करांचा खबरी
अहमदनगर येथील न्यायालयात गुरुवारी ही तक्रार दाखल करण्यात आली. अतिरिक्त मुख्य न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांच्यासमोर यावर प्राथमिक सुनावणी झाली. अॅड. असीम सरोदे यांनी तक्रारदरांतर्फे युक्तिवाद केला. धर्मांध, द्वेषपूर्ण विधाने करून राष्ट्रीय एकात्मता दूषित करून धर्माच्या आधारे तेढ निर्माण करणार्या यती नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, यती नरसिंहानंद सरस्वती हे सातत्याने व्हिडिओ व्हायरल करून दोन धर्मात द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीने वक्तव्य करीत आहेत. त्यांनी देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करून त्यांनाच देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न चालवला आहे. या संदर्भात तक्रारदारांनी तोफखाना पोलीस स्टेशनला नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही. पोलीस अधीक्षकांनाही निवेदने देण्यात आली. मात्र त्यांच्याकडूनही कारवाई झालेली नाही. त्यामुळे न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
वाचा: फ्लॅट, जमिनी, गाड्या… फरार शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांची संपत्ती आहे तरी किती?
प्रसार माध्यमांशी बोलताना अॅड. सरोदे म्हणाले की, नरसिंहानंद सरस्वती यांचे कृत्य धर्मांधतेचे उदाहरण आहे. भारताच्या एकात्मतेला धक्का लावण्याचे काम ते करीत आहेत. अशा प्रवृत्तीच्या लोकांवर गुन्हे दाखल होऊन त्यांच्यावर कारवाई झाल्यास कट्टरवादी धर्मांधांना लगाम लागणार आहे. अहमदनगर शहर हे क्रांतीचे शहर असून, अनेक क्रांतिकारक परिवर्तन करणारे लोक या शहराने दिले आहेत. पोलीस अधिक्षकांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन न्यायालयाच्या निकालाची वाट न पाहता संबंधितांवर गुन्हा दाखल केला पाहिजे. यावेळी अॅड. अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई, अॅड. फारुक बिलाल, अॅड. शाकिब शेख, अॅड. इरफान शेख उपस्थित होते.
वाचा: वैशाली झनकर लाच प्रकरण ताजे असतानाच या घटनेमुळं नगरमधील शैक्षणिक वर्तुळात खळबळ
Recover your password.
A password will be e-mailed to you.