Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

HSC Result : बारावीचा निकाल जाहीर, निकालाचा टक्क कशामुळं घसरला? बोर्डानं थेट कारण सांगितलं

9

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पुण्यात पत्रकार परिषद घेत बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा गतवर्षीच्या तुलनेत बारावीचा निकाल घटला आहे. यंदाच्या बारावीच्या परीक्षेच्या निकालात ९१.२५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर आदी या वेळी उपस्थित होते. राज्यातील १४ लाख ५७ हजार २८३ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.

बारावीचा मार्च – एप्रिल २०२२ चा निकाल ९४.२२ टक्के इतका लागला होता तर यंदाचा निकाल हा ९१.२५ टक्के इतका लागला आहे. या वर्षी निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे. मात्र, शरद गोसावी यांनी दिलेल्या माहितीनुसार फेब्रुवारी-मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता फेब्रुवारी-मार्च २०२३ चा निकाल ०.५९ टक्के वाढला आहे.

Check HSC Result 2023: अवघ्या ४ स्टेप्स आणि काही क्षणात पाहा बारावीचा संपूर्ण निकाल

निकाल का घटला? बोर्डानं कारण सांगितलं

बारावीचा यंदाचा निकाल २.९७ टक्क्यांनी घटला आहे, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली. निकाल का घटला हे सांगताना शरद गोसावी यांनी २०२१-२२ ची बारावीची परीक्षा आणि २०२२-२३ ची परीक्षा यातील फरक सांगितला. ते म्हणाले की मागील परीक्षा ही वेगळ्या वातावरणात पार पडली होती. विद्यार्थ्यांना ७०, ८०, किंवा १०० गुणांच्या परीक्षेसाठी अर्धा तास वाढीव दिला गेला होता. ती परीक्षा पंच्याहत्तर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा प्रत्यक्ष घेण्यात आली होती. यावर्षी शंभर टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेण्यात आली. यावेळी कोणताही वाढीव वेळ दिला नव्हता. हे प्रामुख्यानं लक्षात घेतलं पाहिजे, असं शरद गोसावी यांनी सांगितलं.

HSC Results 2023: कोकणातील पोरं हुश्शार, बारावीच्या परीक्षेत बाजी, मुंबईत सर्वाधिक कमी निकाल
आपण नियमित परीक्षा म्हणतो म्हणजे जशी परीक्षा २०२० मध्ये पार पडली होती तशी परीक्षा यंदा पार पडली. २०२० चा निकाल ९०.६६ टक्के होता आणि २०२३ चा निकाल ९१.२५ टक्के आहे. म्हणजे २०२० च्या निकालाची २०२३ निकालाश जर तुलना केली. तर यंदाचा निकाल ०.५९ टक्क्यांनी वाढलेला दिसतो, असं गोसावी म्हणाले.
Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल जाहीर,मुलींनी यंदाही मारली बाजी, जाणून घ्या निकालाची वैशिष्ट्ये

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.