तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

​Vastu Tips: पावसाळ्यात वास्तूनुसार घरात करा ‘या’ गोष्टी; अडचणींचा होईल नायनाट, लाभेल सुदृढ आरोग्य

0 45

या महिन्यात स्वच्छता झालीच पाहिजे

कमीत कमी वर्षातून तीन वेळा आपल्या घराची पूर्ण स्वच्छता झाली पाहिजे. जून महिन्यात प्रथम स्वच्छता करावी कारण उन्हाळ्यात वाऱ्याच्या माध्यमातून धूळ येते, वातावरण ड्राय असते, पाऊस वाढला तर आद्रता वाढते, मग बुरशी होते आणि आजारपण वाढते.

पिण्याचे पाणी या दिशेला असावे

पिण्याचे पाणी या दिशेला असावे

पूर्व, उत्तर, ईशान्य भागात पिण्याचं पाणी किंवा भांडी ठेवणे.काहीही झालं तरी आग्नेय भागात पिण्याचं पाणी ठेऊ नये. जर पूर्व, ईशान्य, उत्तर ह्या दिशा नाही मिळाल्या तर दक्षिण-नैऋत्य-पश्चिम या भागात पिण्याचं पाणी ठेऊ शकता.
पण जर फक्त पाणी दक्षिण-नैऋत्य-पश्चिम भागात आलं किंवा ठेवलं तर पाणी साठवणुकीचा ओटा लगेच साफ ठेवा व ईशान्येला पाण्याचा जग भरून पिण्यासाठी वापरावा. गॅस शेगडीच्या वरती किंवा आजूबाजूला पाण्याची टाकी ठेऊ नये.

​सुरक्षित पाणी​

​सुरक्षित पाणी​

पावसाळ्यात घरात येणाऱ्या पाण्यातून रोगजंतू येऊ नयेत यासाठी एक लिटर पाण्यासाठी प्रत्येकी पाच ग्रॅम निवळी, तुरटी, टंकण, वाळा, सुंठ, वावडिंग आणि हळद टाकून ते पाणी उकळून त्याचा पिण्यासाठी वापर करावा.

घरातली हवा

घरातली हवा

घरात मोकळी, शुद्ध हवा येण्यासाठी धूपन, एसी, धूर करण्याबरोबरच निर्गुडी, हळद, वड, औदुंबर, निवडुंग, तुळस, एरंड यांच्या पानांचा धूर करावा. हा धूर घरात प्रसन्नता, निर्मळता आणि आरोग्य आणतो.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.