
Tej Police Times
पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी व्रत करून मनुष्याने दोन्ही वेळी भगवान विष्णूची पूजा करावी. संध्याकाळी भगवान विष्णूच्या मूर्तीची स्थापना करून भगवान विष्णूला दूध, दही, तूप, मध आणि गंगाजलाने स्नान घालावे. यानंतर त्यांना मऊ पलंगावर झोपपावे. त्यांच्यासाठी मऊ पलंग, गादी, उशी, मच्छरदाणी यांची सुंदर व्यवस्था करावी. डोक्यावर तुळशीचे पानही ठेवावे. अशा देवाच्या पलंगाची व्यवस्था करणाऱ्या भक्तावर देव खूप प्रसन्न होतो असे सांगितले जाते.
देवशयनी एकादशीच्या दिवशी पूजेदरम्यान हवन आणि विष्णू सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा. पद्मपुराणानुसार विष्णु सहस्रनामाचा पाठ करणार्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्त करतात. शक्य असल्यास या दिवशी उपवास ठेवावा आणि सहस्रनाम अर्थात भगवान विष्णूच्या हजार नामांचा जप करताना तूप आणि काळ्या तिळाने हवन करावे. याद्वारे भगवंत तुम्हाला मागील जन्मी, जाणूनबुजून किंवा नकळत केलेल्या पापांपासून मुक्त करतात असे सांगितले जाते.
पद्मपुराणानुसार देवशयनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. अशा स्थितीत रात्री जागृत राहून भजन कीर्तन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. या दिवशी उपवास करणाऱ्यांनी रात्री जागरण करण्याचा प्रयत्न करावा.
आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर आंघोळ करून चातुर्मासाचा संकल्प करा. पद्मपुराणात असे सांगितले आहे की, चातुर्मास व्रताचा संकल्प करा आणि एकवेळच भोजन करा. तसेच देवशयनी एकादशीपासून देव प्रबोधिनी एकादशीपर्यंत जमिनीवर झोपावे. कारण यावेळी भगवान विष्णू निद्रावस्थेत असतात. याशिवाय चातुर्मासात केळीच्या पानांवर जेवण घ्यावे आणि ब्रह्मचर्य पाळावे. जे विष्णू भक्त आषाढी एकादशीला या पद्धतीने उपवास करतात, त्यांना देव मोक्ष देतो.
पद्मपुराणानुसार एकादशी तिथीला केलेले दान माणसाला अनेक जन्मांचे फळ देते. म्हणूनच देवशयनी एकादशीच्या दिवशी व्यक्तीने अन्न आणि पलंग दान करावे. या दिवशी दान केल्याने तुम्हाला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होईल. यासोबतच माणसाच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही.
Recover your password.
A password will be e-mailed to you.