
Tej Police Times
क्लिक करा आणि वाचा- बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणेंना येऊच देणार नाही; राऊत कडाडले
पवार यांच्यावर टीकेचे प्रहार करताना खोत यांनी तुमची राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, असे म्हटले आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिलेला नाही, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला गेला. मात्र आता जर घटना दुरुस्ती करून राज्याला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्ही आता परत केंद्र सरकारला कसा काय दोष देता, असा सवालही खोत यांनी उपस्थित केला आहे.
क्लिक करा आणि वाचा- पैशांचा पाऊस पाडणारी ‘ती’ टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात
‘प्रथम ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा’
प्रथम ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा आणि त्यानंतरच तुम्हाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल. मात्र, असे असतानाही तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि केंद्र सरकारला दोष देणार, असे खोत म्हणाले. मराठा समाज मागासलेला सिद्ध करण्यासाठी डेटा गोळा करावा लागेल. हा डेटाही तुम्हाला मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून गोळा करावा लागणार आहे. मात्र, हे तुम्ही करणार नाही आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणार, असेही खोत पुढे म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा- ‘अनिल देशमुखांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, लुक आऊट नोटीस जारी करा, त्यांना फरार घोषित करा’
शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात तुम्ही साठ वर्षात सत्तेत होता, मग तेव्हा घटनादुरुस्ती का केली नाही?, तुमचे हात कुणी बांधले होते का? असा सवालही खोत यांनी विचारला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.