Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

sharad pawar: पवारसाहेब, तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का?; सदाभाऊ खोतांचा निशाणा

15

सांगली: राज्याचे माजी कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ओबीसी आरक्षणाबाबत केंद्र सरकारवर साधलेल्या निशाण्यावरून पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शरद पवार साहेब तुम्ही कधी करी खरे बोलणार आहात का?, तुमची सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे?, अशा शब्दांत खोत यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

सदाभाऊ खोत शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की, शरद पवार तुम्ही ज्येष्ठ आहात. तुम्ही कधीतरी खरे बोलणार आहात का?, असे सवाल उपस्थित करतानाच अजून किती वर्षे समाजा-समाजात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचा उद्योग करणार आहात, अशा शब्दात खोत यांनी पवार यांच्यावर टीकेचे प्रहार केले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राणेंना येऊच देणार नाही; राऊत कडाडले

पवार यांच्यावर टीकेचे प्रहार करताना खोत यांनी तुमची राजकारणाची आणि सत्तेची खुर्ची उबवण्याची हौस कोणत्या जन्मात फिटणार आहे? हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा, असे म्हटले आहे. १०२ व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारला मागास ठरवण्याचा अधिकारी राहिलेला नाही, असे शरद पवार यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड समितीचा अहवाल फेटाळला गेला. मात्र आता जर घटना दुरुस्ती करून राज्याला अधिकार मिळाला असेल, तर मग तुम्ही आता परत केंद्र सरकारला कसा काय दोष देता, असा सवालही खोत यांनी उपस्थित केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- पैशांचा पाऊस पाडणारी ‘ती’ टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

‘प्रथम ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा’

प्रथम ओबीसी समाजाचा डेटा गोळा करा आणि त्यानंतरच तुम्हाला ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण देता येईल. मात्र, असे असतानाही तुम्ही डेटा गोळा करणार नाही आणि केंद्र सरकारला दोष देणार, असे खोत म्हणाले. मराठा समाज मागासलेला सिद्ध करण्यासाठी डेटा गोळा करावा लागेल. हा डेटाही तुम्हाला मागासवर्गीय समितीच्या माध्यमातून गोळा करावा लागणार आहे. मात्र, हे तुम्ही करणार नाही आणि फक्त केंद्राकडे बोट दाखवणार, असेही खोत पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘अनिल देशमुखांविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट, लुक आऊट नोटीस जारी करा, त्यांना फरार घोषित करा’

शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत पुढे म्हणाले की, केंद्रात आणि राज्यात तुम्ही साठ वर्षात सत्तेत होता, मग तेव्हा घटनादुरुस्ती का केली नाही?, तुमचे हात कुणी बांधले होते का? असा सवालही खोत यांनी विचारला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.