Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवीन ग्राहक जिओमध्ये होत आहेत सामील
TRAI च्या जूनच्या अहवालानुसार, एप्रिल २०२३ मध्ये, सुमारे ३.७३ लाख नवीन वापरकर्ते Jio च्या नेटवर्कशी जोडले गेले आहेत. हा आकडा सर्वाधिक आहे. तर एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाने त्यांचा मोठा युजरबेस गमावला आहे. बहुतेक नवीन वापरकर्ते पूर्व उत्तर प्रदेशमधून जिओमध्ये सामील होत आहेत. फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिल या तीन महिन्यांत जिओने आपल्या नेटवर्कमध्ये सर्वाधिक युजर्स जोडले आहेत. एप्रिल २०२३ मध्ये, एअरटेलने देखील सुमारे १.३९ लाख वापरकर्ते गमावले आहेत. तसंच व्होडाफोन आयडियाने सुमारे ८१ हजार वापरकर्ते गमावले आहेत. एप्रिलमध्ये बीएसएनएलने सुमारे ३३ हजार युजर्स जोडले आहेत. आकडेवारीनुसार, पूर्व उत्तर प्रदेशात दर महिन्याला लाखो वापरकर्ते Jio च्या नेटवर्कशी कनेक्ट होत आहेत.
कोणी किती ग्राहक जोडले?
ट्रायच्या अहवालानुसार, या वर्षी फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत एकट्या जिओने सुमारे ९.३६ लाख वापरकर्ते जोडले आहेत. दुसरीकडे, व्होडा-आयडियाचे सुमारे ३.३१ लाख वापरकर्ते आणि बीएसएनएलने याच कालावधीत सुमारे ३.५० लाख वापरकर्ते गमावले आहेत. एअरटेलने या तीन महिन्यांत केवळ ६० हजार युजर्स जोडले आहेत. दरम्यान ही आकडेवारी पाहिली, तर जिओ जरी सर्वाधिक ग्राहक जोडत असेल तर किमान एअरटेलही काही प्रमाणात ग्राहक जोडत आहे. दुसरीकडे वोडाफोन-आय़डिया, बीएसएनएल यांचे ग्राहक घटतचं आहेत. त्यामुळे भविष्यात फक्त जिओ आणि एअरटेल हे दोनच नेटवर्क टिकतील असं वाटत आहे.
वाचा : एअरटेल की जिओ? ६६६ रुपयांमध्ये कोणाचा रिचार्ज आहे बेस्ट?