तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

Jio 999rs Phone : स्मार्टफोनच्या जमान्यातही जिओनं का लाँच केला फीचर फोन? पाहा काय आहे मास्टर प्लान

0 40

नवी दिल्ली: : मुकेश अंबानी हे भारतातील एक मोठे उद्योगपती आहेत. अशा परिस्थितीत जेव्हा त्यांनी ९९९ रुपयांचा स्मार्टफोन लाँच केला तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. तर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीमत्वांपैकी एक असलेले मुकेश अंबानी यांनी एकीकडे स्मार्टफोनची क्रेझ असताना स्वस्त असा फीचर फोन ९९९ रुपयांमध्ये लाँच केला आहे. त्यामुळे प्रश्न पडतो की स्मार्टफोनच्या जमान्यात जिओने स्वस्त फीचर फोन लॉन्च करण्यामागे कारण काय? जेव्हा देश 5G आणि 6G कडे वाटचाल करत आहे आणि लोक मोठ्या प्रमाणात स्मार्टफोन खरेदी करत आहेत. अशा वेळी 4G फीचर फोन का लाँच केला असावा हे जाणून घेऊ…

फीचर फोन लाँच करण्यामागे कारण काय?
तर जिओने हा ९९९ रुपयांमध्ये 4G फीचर फोन लाँच करण्यामागे एक मोठा हेतू आहे. कंपनीला माहित आहे की, देशातील सुमारे २५ कोटी लोक सध्या फीचर फोनवर 2G सेवा वापरत आहेत. मुकेश अंबानीनी या वापरकर्त्यांनाच लक्ष्य केले आहे, जे महागडे स्मार्टफोन खरेदी आणि रिचार्ज करण्यास सक्षम नसल्यामुळे फीचर फोन आणि 2G सेवेसह काम करत होते. या फोनद्वारे जिओने 2G मुक्त भारताचा नारा दिला आहे.

हा तोट्याचा नसून नफ्याचा सौदा
समजा जर २५ कोटी 2G वापरकर्त्यांनी Jio फीचर फोन खरेदी केला तर फीचर फोन नफा कमवेल. तसेच, जर तुम्ही एका महिन्याला0 किमान १२३ रुपयांचा रिचार्ज केला तर प्रत्येक वापरकर्ता एका वर्षात सुमारे १,५९९ खर्च करेल. त्याचप्रमाणे जर २५ कोटी वापरकर्ते वर्षभरात Jio ला १,५९९ रुपये १२३ रुपये देत असतील तर Jio कंपनीला मोठा फायदा होईल. त्याबरोबरच स्मार्टफोनची विक्री स्वतंत्रपणे कमाई करेल. यासोबतच येत्या काही दिवसांत 4G वापरकर्ते 5G कडे वळतील, त्यामुळे कंपनीचे भविष्यातील नियोजन खूप स्पष्ट आहे. याचा अर्थ Jio कंपनी केवळ विद्यमानच नव्हे तर भविष्यातील संभाव्य वापरकर्त्यांनाही लक्ष्य करत आहे.

वाचा : ChatGPT म्हणजे नेमकं काय? खरंच यामुळे नोकऱ्या धोक्यात आहेत का? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.