
Tej Police Times
पदव्युत्तर आणि पीएचडी कार्यक्रमांमध्ये अर्धवट शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे कामाच्या मिळणाऱ्या विविध संधी आणि इतर चांगल्या संधींसाठी विद्यार्थी आपला अभ्यास सोडतात हे सर्वात मोठे कारण आहे. शिवाय, न जमणारा अभ्यास, विविध वैयक्तिक आणि अनेक वैद्यकीय कारणांमुळेही बहुतेक विद्यार्थ्यांनी त्यांचे पदवीचे शिक्षण सोडतात. राज्यमंत्री (MOS) सुभाष सरकार यांनी राज्यसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. शिवाय, यासंदर्भातील विविध कारणांवरही त्यांनी प्रकाश टाकला.
(वाचा : Education Loan : पहिली ते बारावीच्या शिक्षणासाठी कर्जाची सुविधा; या बँकेतून मिळते शिक्षणासाठी कर्ज)
राज्यमंत्री सुभाष सरकार यांनी राज्यसभेत दिलेल्या माहितीनुसार, आपले शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या विद्यार्थ्यंनाचे (गळतीचे) प्रमाण कमी करण्यासाठी संस्थांनी अनेक सकारात्मक सुधारणा केल्या आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीवर लक्ष ठेवण्यासाठी समुपदेशकांची नियुक्ती, शैक्षणिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त वर्गांची तरतूद, विद्यार्थ्यांना तणावमुक्त करणारे समुपदेशन, मानसिक प्रेरणा इत्यादींचा समावेश करण्यात आला आहे.
स्वातंत्र्यप्राप्तीपासून भारतामध्ये गळती (Educational Dropout) ही मोठी समस्या आहे. तथापि, हे कमी करण्यासाठी, सरकारकडून वेळोवेळी विविध पावले उचलली गेली आहेत, तरीही गळती ही एक मोठी समस्या आहे.
(वाचा : IITB BSc Engineering: आयआयटी मुंबईच्या बीटेक कोर्सच्या तिसऱ्या वर्षी बाहेर पडल्यानंतर मिळणार बीएससीची पदवी)
Recover your password.
A password will be e-mailed to you.