Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Adhik Maas Purnima 2023: आज अधिक श्रावण मासाची पौर्णिमा, धनवृद्धीसाठी घरच्याघरी करा ‘या’ गोष्टी

9

आज १ ऑगस्ट रोजी अधिक श्रावण मासातील पौर्णिमा तिथी आहे. १८जुलैपासून अधिक श्रावण महिन्याची सुरुवात झाली असून, १६ ऑगस्टला अधिकमास संपणार आहे. प्रत्येक महिन्याची पौर्णिमा तिथी विशेष असली तरी शास्त्रात अधिकामास पौर्णिमा तिथीला विशेष महत्व दिले आहे. अधिकामास पौर्णिमेला भगवान विष्णूची पूजा करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. याशिवाय पौर्णिमेच्या तिथीला स्नान आणि दान केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. श्रावण पौर्णिमा तिथीचा शुभ मुहूर्त आणि विशेष उपाय सांगत आहोत.

श्रावण पौर्णिमा तिथी मुहूर्त

श्रावण पौर्णिमा १ ऑगस्ट रोजी पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांनी सुरू झाली आहे आणि २ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२ वाजता समाप्त होईल. त्यामुळे उदया तिथीनुसार १ ऑगस्टची पौर्णिमा मानली जाईल. स्नान दान करण्याचा शुभ मुहूर्त १ ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजून १८ मिनिटे ते ५ वाजेपर्यंत आहे.

अधिक श्रावण पौर्णिमेला ३ शुभ योग

श्रावण अधिकमास पौर्णिमेला ३ विशेष शुभ योग तयार होत आहेत. या दिवशी आयुष्मान योग सकाळी ६ वाजून ५३ मिनिटांनी सुरू होईल आणि २ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून ३४ मिनिटांनी समाप्त होईल. दुसरीकडे, प्रीती योग आज रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी सुरू होईल आणि ६ वाजून ५३ मिनिटांनी समाप्त होईल. याशिवाय १ ऑगस्टला लक्ष्मी नारायण योगही तयार होत आहे. जे खूप शुभ मानले जाते. या दिवशी भगवान लक्ष्मी नारायणाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. तुमच्यासाठी संपत्ती मिळवण्याचे नवीन मार्ग खुले होत आहेत. तुमच्या घरात पैशांचा पाऊस पडेल.

अधिक श्रावण पौर्णिमा उपाय

श्रावण पौर्णिमेला दुधात पाणी मिसळून त्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून पिंपळाच्या झाडाला अर्पण करा आणि तुपाचा दिवा लावा. असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्या घरी येईल.

अधिक श्रावण पौर्णिमेला विष्णु सहस्त्रनामाचा पाठ केल्यास लाभ होईल. यासोबतच गव्हाच्या पिठाच्या पंजिरीमध्ये तुळशीची पाने अर्पण करून भगवान विष्णूला नैवेद्य दाखवा.

संपत्ती मिळविण्यासाठी पौर्णिमेच्या रात्री चंद्राला दूध अर्पण करावे. असे केल्याने लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरी येते.

लग्नात येणारे अडथळे दूर करण्यासाठी पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्याच्या वस्तू गौरी मातेला अर्पण करावेत. यामुळे अविवाहित लोकांचे लग्न होण्याची शक्यता निर्माण होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.