
Tej Police Times
इंडिया को हराना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है-आमचा पराभव करणं कुणाच्या बापाला शक्य नाही: राऊत
‘एम. कॉम. अभ्यासक्रमाची तिसऱ्या सत्राची परीक्षा २८ मार्च ते १० एप्रिलदरम्यान पार पडली. तर, चौथ्या सत्राची परीक्षा ७ जुलै ते २६ जुलैदरम्यान घेण्यात आली. मात्र अद्यापही दोन्ही परीक्षांचा निकाल विद्यापीठाने जाहीर केलेला नाही. पीएचडीसाठी त्यातून अडचण येत आहे. तसेच तृतीय सत्रात एखादा विषय राहिल्यास त्याच्या पुनर्मूल्यांकनासाठी आणि पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना काही महिन्यांची वाट पाहावी लागेल. त्यातून अडचणीत भर पडणार आहे’, अशी प्रतिक्रिया एका विद्यार्थिनीने दिली.
विद्यापीठाच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांना होणारा मनस्ताप नित्याचाच झाला आहे. विद्यापीठाने तिसऱ्या आणि चौथ्या सत्राचा निकाल लावला नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. हा प्रकार तत्काळ थांबवून निकाल जाहीर करावा, तसेच जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणी युवा सेना (शिंदे गट) उपसचिव सचिन पवार यांनी केली आहे.
मी उद्धव ठाकरेंना निरोप दिलाय, ते माझा मेसेज इंडियाच्या बैठकीत देतील : प्रकाश आंबेडकर
याबाबत विद्यापीठ प्रशासनाला विचारणा केली असता मूल्यांकन अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले. मात्र, निकाल कधीपर्यंत जाहीर केला जाईल याबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही.
आईच्या पार्थिवाला लेकींनी खांदा दिला, घिसाडी समाजातील प्रथेला मूठमाती
एम. ए. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राच्या निकालांना विलंब
विद्यापीठाच्या जानेवारी सत्राच्या एम. ए. अभ्यासक्रमाच्या चौथ्या सत्राची परीक्षा २८ मार्च ते ४ एप्रिल या काळात पार पडली होती. मात्र या परीक्षेला तब्बल १४७ दिवस उलटून गेले तरी अद्याप निकाल जाहीर करण्यात आलेला नाही. याबाबत ई-मेलद्वारे विद्यार्थ्यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र विद्यापीठाने कोणताही प्रतिसाद दिला नाही, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर, परीक्षेच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून निकाल लवकरच जाहीर केला जाईल, असे विद्यापीठाने सांगितले.
तुमच्यामुळे उसाला दर मिळाला अन् शिक्षण पूर्ण करता आलं, चाहत्याने घरी बोलावून केला राजू शेट्टींचा सन्मान
Recover your password.
A password will be e-mailed to you.