Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘Girl Child’’ पुनिता कुमारीची प्रेरणात्मक कहाणी, लग्नानंतर २१ वर्षांनी झाली सरकारी अधिकारी

32

Assistant Commissioner of Taxation Punita Kumari: पुनिता कुमारी या बिहारमधील सुपौल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांना लहानपणापासूनच संघर्षांचा सामना करावा लागला. त्यांचे वडील मजूर होते. त्यामुळे अगदी तुटपुंज्या कमाईत कसा तरी घरखर्च भागवला जात असे. आई-वडील, पुनिता आणि पुनिता यांच्या पाच बहिणी असे पुनिताचे कुटुंब. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असणार्‍या पुनिताला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. पण, खेड्यात अनेकदा मुलींची लग्ने लवकर होतात. पुनिताच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं. लहान वयातच त्यांचे लग्न झाले. पण, काहीतरी करण्याची ज्योत त्याच्या मनात सतत तेवत होती. त्यामुळे, लग्नानंतर २१ वर्षांनी पुनिता सरकारी अधिकारी बनल्या. त्यांची ही संघर्ष गाथा जाणून घेऊया.

लहानपणीपासून गरीबी :

पुनिताचा जन्म बिहारच्या सुपौल जिल्ह्यात झाला. वडील मजूर होते. ती पाच बहिणींसोबत वाढत होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पुनिता अभ्यासात चांगली होती. यासाठी त्याला जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश मिळाला. खेळातही ती अव्वल होती. मात्र, वडील मजूर म्हणून काम करायचे व त्यांना पाच बहिणी होत्या. एवढे मोठे कुटूंब पण कमवता एकटाच माणूस होता.वडील मजुरीवर घरचा खर्च भागवायचे. त्यामुळे पुनिता यांनी शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी जवाहर नवोदय विद्यालयाची निवड केली. कितीही अडथळे आले तरी देखील शिक्षण पूर्ण करायचे व त्यांनी ते बारावी पर्यंत पूर्ण केले. पण त्यांचे बारावीनंतर लग्न झाले. इतक्या कमी वयात शिक्षण सोडून संसाराची जबाबदारी अंगावर पडली.

सासरी आयुष्यही खडतर :

सासरच्या घरची परिस्थिती कमी-अधिक प्रमाणात आई-बाबांच्या घरासारखीच होती. पुनीत घरातील कामात गुंतत राहिला. अडचणींचा डोंगर त्यांची वाट पाहत होता. काही वर्षांनी त्यांच्या पतीची देखील नोकरी गेली व आर्थिक परिस्थिती आणखीनच खालावली. दरम्यान त्यांना दोन मुले झाली. बरं, 2004 मध्ये माझे पती पुन्हा नोकरीला लागले. हे सगळे सुरू असताना मात्र २००४ला नशिबाने त्यांच्या पतीला पुन्हा नोकरी लागली. परंतु तरीदेखील यातून खर्च भागत नव्हता व आर्थिक अडचणी थांबत नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आता स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याचे ठरवले. त्या फक्त शिक्षणातचं हुशार नव्हत्या तर खेळामध्ये देखील अव्वल होत्या. त्यामुळे धाडसीपणा हा मूळात गुण होताच. स्पर्धा परीक्षा द्यायची तर पदवी शिक्षण हवे म्हणून त्यांनी लग्नानंतर तब्बल तेरा वर्षानंतर पदवी पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला.

(वाचा : Shloka Mehta Education: देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब म्हणून ओळख असणार्‍या अंबानी घराण्याची सून ‘श्लोका’चे शिक्षण तरी किती..?)

घर आणि नोकरी सांभाळत तारेवरची कसरत :

लग्नाच्या १३ वर्षांनंतर म्हणजेच २००७ मध्ये त्यांनी ग्रॅज्युएशनला प्रवेश घेतला. शिक्षण करत असताना घरी आर्थिक हातभार लागावा म्हणून त्यांनी एका शाळेमध्ये नोकरी देखील केली. संसार सांभाळणे व अभ्यासाची तयारी अशा बिकट वाटेवर त्यांचा प्रवास सुरू होता. त्यांना आपल्या दोन मुलांचीही काळजी वाटत होती. आपल्या आयुष्यात आपण जे दिवस पहिले त्यातून आपल्या मुलांनी जाऊ नये असे त्यांना वाटत होते. म्हणून, शिक्षण, घर आणि नोकरी सांभाळण्यासोबतच त्यांनी सरकारी नोकरीची तयारीही सुरू केली.

अखेर ‘सहाय्यक कर आयुक्त’ म्हणून नेमणूक :

पदवी शिक्षण उशीरा पूर्ण झाल्याने त्यांनी भरती होण्यासाठी अनेक पर्याय शोधायला सुरुवात केली व या माध्यमातून बिहार पब्लिक सर्विस कमिशन अर्थात बीपीएससीची तयारी केली. २०१८ मध्ये पुनिताने बीपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन बिहारमध्ये सहाय्यक कर आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. पण, ही परीक्षा पास होण्याअगोदर त्यांनी उच्च न्यायालयात पॅरा ज्युडीशियरी (Para Judiciary) परीक्षा देखील उत्तीर्ण केली होती व उच्च न्यायालयामध्ये त्यांनी या पदावर काम केले. आज त्या बिहारमध्ये सहाय्यक कर आयुक्त (Assistant Commissioner of Taxation) या पदावर कार्यरत आहेत. शिवाय, पुनिताने आपल्या दोन्ही मुलांना शिक्षण देऊन चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.

(वाचा : Success Story IAS Kartik Jivani: आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो तीनवेळा स्पर्धा परीक्षेला बसून तीनही वेळा यशस्वी झाला)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.