Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स’ मध्ये महाभरती; जाणून घ्या पदे पात्रता आणि वेतन

11

UIIC Recruitment 2024: तुम्ही जर पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. य भरतीद्वारे ‘सहाय्यक’ या पदाच्या एकूण ३०० रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच कंपनीने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणार्‍या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून अर्ज प्रक्रिया १६ डिसेंबर २०२३ पासून सुरु होणार आहे. तर ०६ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लि. भरती २०२३ मधील पदे आणि पदसंख्या :
सहाय्यक – ३०० जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ३०० जागा

COSMOS Bank Recruitment 2023: पुण्यामध्ये कॉसमॉस बँकेत ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच त्याला लेखन, वाचन आणि उत्तम संवाद कौशल्याची जाण असावी.

वयोमर्यादा : किमान वय २१ वर्षे ते कमाल वय ३० वर्षे. यामध्ये राखीव प्रवर्गाला सवलत देण्यात आली आहे.

अर्ज शुल्क : या भरतीकरिता १००० रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी/ एसटी आणि राखीव प्रवर्गाला २५० रुपये अर्जशुल्क आहे.

अर्ज पद्धती :
ऑनलाइन

अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : १६ डिसेंबर २०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ जानेवारी २०२४

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०६ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.