
Tej Police Times
मात्र शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी वाड्यावस्त्यांवर सुरू झालेल्या अनेक शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. राज्यात २०पेक्षा कमी पटाच्या १४ हजार ७८३ शाळा आहेत. या शाळांमध्ये १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत. तर २९ हजार ७०७ शिक्षक या शाळांतून अध्यापनाचे काम करत आहेत. या विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या अनुषंगाने विविध सुविधा मिळाव्यात यासाठी नंदुरबार येथील तोरणमाळ आणि पुण्यातील पानशेत येथील समूह शाळांच्या धर्तीवर राज्यातील दुर्गम भागात समूह शाळा तयार करण्याचा सरकारचा मानस आहे.
सप्टेंबरमध्ये दिले होते आदेश :
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी कमी पटाच्या शाळांचे एकत्रीकरण करून समूह शाळा तयार करता येतील, असे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश यांनी राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षण उपसंचालक आणि शिक्षणाधिकारी यांना सप्टेंबरमध्ये दिले होते. त्यानुसार राज्यभरातील विविध जिल्ह्यांतून १६३ समुह शाळा सुरु करण्याबाबतचे प्राथमिक स्तरावरील प्रस्ताव शिक्षण विभागाला प्राप्त झाले आहेत. शिक्षण विभागाकडून या प्रस्तावांची सुसाध्यता तपासली जाणार आहे. त्यामध्ये भौतिक सुविधांच्या विकासासाठी अपेक्षित खर्च, तसेच विद्यार्थ्यांच्या घरापासून समुह शाळेपर्यंत वाहतूक करण्यासाठी येणारा खर्च यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर हे प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केले जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
ठाण्यात एक समूह शाळा :
ठाण्यातील शहापूर तालुक्यातील डेहणे या गावात समुह शाळा तयार करण्याचा विचार केला जात आहे. जिल्हा परिषद शाळा डेहणे या शाळेत सद्यस्थितीत ७४ विद्यार्थी शिकत आहेत. तर या शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. जि. प. शाळा डेहणे या शाळेत एकूण सहा शाळा समाविष्ट करून त्यांची समूह शाळा तयार करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तसा प्रस्ताव ठाणे जिल्हा परिषदेकडून शिक्षण आयुक्तांकडे सादर करण्यात आला आहे. समूह शाळा तयार झाल्यावर डेहणे येथील समूह शाळेची विद्यार्थी पटसंख्या १६२ होणार आहे. येथे सात शिक्षक कार्यरत असतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.