तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

सोलापूर महानगरपालिकेत भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन

0 35

Solapur Mahanagarpalika Recruitment 2023: सोलापूर महानगरपालिका यांच्या अंतर्गत मोठी भरती सुरू आहे. या भरती अंतर्गत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिक), सहायक कनिष्ठ अभियंता (बांधकाम), रसायनशास्त्रज्ञ, फिल्टर प्रभावक या पदांच्या एकूण ७६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

नुकतीच सोलापूर पालिकेने याबाबत अधिकृत अधिसूचना जाहीर केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ३१ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘सोलापूर महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) ४७ जागा
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – ०२ जागा
सहायक कनिष्ठ अभियंता (बांधकाम) – २४ जागा
रसायनशास्त्रज्ञ – ०१ जागा
फिल्टर प्रभावक – ०२ जाग
एकूण रिक्त पदसंख्या – ७६ जागा

BMC Recruitment 2023: मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात भरती; ‘ही’ आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा रसायनशास्त्र परीक्षा उत्तीर्ण असावा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.

वेतनश्रेणी –
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
कनिष्ठ अभियंता (यांत्रिक) – ३८ हजार ६०० ते १ लाख २२ हजार ८००
सहायक कनिष्ठ अभियंता (बांधकाम) – २९ हजार २०० ते ९३ हजार २००
रसायनशास्त्रज्ञ – २९ हजार २०० ते ९३ हजार २००
फिल्टर प्रभावक – २५ हजार ५०० ते ८१ हजार १००

नोकरी ठिकाण – सोलापूर

अर्ज पद्धती – ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘सोलापूर महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच ३१ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.