Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पितृपक्षात दररोज करा फक्त हे ५ काम, पितृदोषापासून होईल मुक्ती

4

पितृपक्षात जल अर्पण करावे

पितृपक्षात दररोज तर्पण करावे, परंतु ज्यांचे आई-वडील हयात आहेत त्यांना तर्पण करण्याचा नियम लागू होत नाही. ज्यांचे आई-वडील हयात आहेत त्यांनी रोज सकाळी आपल्या पितरांचे आणि अधिष्ठाता देवतांचे ध्यान करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे. जे माता-पिता हयात नाहीत किंवा त्यांच्यापैकी कोणीही नसेल त्यांनी पितृपक्षात दररोज दक्षिणाभिमुख करून तर्पण करावे. तर्पण नेहमी पाण्यात दूध आणि तीळ मिसळून करावे.

पितृपक्षात करा हे काम

पितृपक्षात करा हे काम

पितृपक्षात दररोज गाईला चारा खाऊ घालावा. रोज जेवन तयार करताना गायीसाठी पहिली पोळी करावी, असे केल्याने देवी-देवतांचा आशीर्वाद प्राप्त होतो. पितृपक्षात पूर्ण भक्तिभावाने गायीला चारा दिल्यास श्राद्ध विधीचे पूर्ण फळ मिळते आणि पितरही संतुष्ट होतात, असे शास्त्रात सांगितले आहे. पितृ पक्षाच्या काळात गाईला गवत खाऊ घालण्याने पितरांचा नेहमी कुटुंबावर आशीर्वाद राहतो.

या दिशेने दिवा लावावा

या दिशेने दिवा लावावा

पितृ पक्षामध्ये पितरांच्या नावाने दररोज सकाळी आणि संध्याकाळी दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावावा. पितृ पक्षादरम्यान, पूर्वज दक्षिणेकडून पृथ्वीवरील आपल्या नातेवाईकांकडे येतात असे सांगितले जाते. तसेच ज्या दिवशी आपण आपल्या पितरांचे श्राद्ध करतो त्या दिवशी दक्षिणेकडे तोंड करून पितरांना आवाहन करतो.

पितृपक्षात मुख्य दरवाज्यावर करा हे काम

पितृपक्षात मुख्य दरवाज्यावर करा हे काम

पितृपक्षात दररोज संपूर्ण घर स्वच्छ केल्यानंतर मुख्य दरवाजा स्वच्छ करून गंगाजल शिंपडावे. असे केल्याने सकारात्मक ऊर्जा संचारते, तसेच नकारात्मकता आणि दोषांपासून मुक्ती मिळते. असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक शांती मिळेल आणि पितृदोषही दूर होईल. तसेच पितृपक्षात दररोज स्नानाच्या पाण्यात थोडेसे गंगाजल टाकावे.

पितृपक्षात या गोष्टीची काळजी घ्यावी

पितृपक्षात या गोष्टीची काळजी घ्यावी

पितृ पक्षाच्या काळात स्वयंपाकघरात किंवा घराच्या कोणत्याही कोपऱ्यात रिकामी भांडी ठेवू नयेत आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. पितृ पक्षाच्या काळात स्वयंपाकघरात उष्टी भांडी ठेवणे अशुभ मानले जाते. रात्री उष्टी भांडी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील होतो. त्यामुळे पितृ पक्षाच्या काळात उष्टी भांडी घरात ठेवू नयेत.

या मंत्राचा करा जप

या मंत्राचा करा जप

पितृपक्षाच्या काळात दररोज सकाळी स्नान केल्यानंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी या मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळून पितृदोषापासून मुक्ती मिळते.

हा मंत्र म्हणावा –

ॐ पितृगणाय विद्महे जगत धारिणी धीमहि तन्नो पितृो प्रचोदयात्। ॐ देवताभ्य: पितृभ्यश्च महायोगिभ्य एव च। नम: स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नम:।

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.