
Tej Police Times
कृषी शिक्षण अनिवार्य :
निसर्गाची सध्या मोठ्या प्रमाणावर हानी होत आहे. त्यामुळे भविष्यातील कृषी शिक्षणाची गरज ओळखून राज्यातील विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच शेती व निसर्गाचे धडे दिले जाणार आहेत. मुलांमध्ये जर निसर्गाची आवड निर्माण करायची असेल तर कृषी शिक्षणाला पर्याय नाही म्हणून आता पहिलीपासून कृषी हा विषय अनिवार्य केला जाणार आहे.
शिक्षकांनाही मिळणार कृषी शिक्षण :
आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिलीपासून कृषी शिक्षण सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. कृषी शिक्षणासाठी शिक्षण विभागाने नवा मसुदा तयार केला आहे. या नव्या विषयाचा अभ्याक्रमात समावेश करण्यापूर्वी शिक्षकांना देखील याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे. अनेक शिक्षकांनी कृषी विषयाचं शिक्षण घेतलेलं नसतं, कोणी बीएस्सी बीएड केलं आहे, कोणी बीए बीएड केलं आहे, तर कोणी एचएससी डीएड केलं आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना देखील शेतीचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Maharashtra School Timing Change : महाराष्ट्रातील शाळांच्या वेळा बदलणार; आता ‘या’ वेळेत भरणार दुसरीपर्यंतचे वर्ग
Recover your password.
A password will be e-mailed to you.