तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

मार्वेच्या समुद्रकिनारी नवे ‘बीकेसी’? साडेतीन हजार एकर जमिनीवर बिझनेस हब होण्याची चिन्हं

0 34

मुंबई : मालाडजवळील मार्वेच्या समुद्रकिनारी नवे ‘बीकेसी’ वसविले जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जवळपास साडेतीन हजार एकर जमिनीचा समावेश आहे. या विकासासाठी एमएमआरडीएला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय मात्र झालेला नाही.

विविध कंपन्या व बँकांची कार्यालये असलेल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) सर्वात मोठा स्रोत आहे. मात्र आता तेथे भाडेतत्त्वावर देण्यासाठी फार मोकळे भूखंड राहिलेले नाहीत. यामुळे बीकेसीच्या महसूलाचा स्रोत आटला आहे. या पार्श्वभूमीवर मालाड येथील सहा गावांमधील जमिनीवर नवे ‘व्यवसाय केंद्र’ उभे करण्याच्या माध्यमातून एमएमआरडीएला नव्या रूपात महसूल मिळू शकणार आहे.

अजितदादांचा कट्टर समर्थक ठाकरेंच्या भेटीला, मावळमध्ये शह बसणार? वाचा ग्राऊण्ड रिपोर्ट
बीकेसीच्या धर्तीवरील हे नवे व्यावसायिक केंद्र मार्वेसह मालवणी, अक्सा, दारवली, एरंगळ व मढ या गावांमध्ये उभे करण्याचे नियोजन आहे. या गावांमधील १,३८७ हेक्टर म्हणजेच ३ हजार ४२७ एकर जमिनीचा त्यात समावेश आहे. यामधील काही जमीन ही मुंबई महापालिका क्षेत्रातील ‘विशेष नियोजन’ श्रेणीतील तर काही जमीन ही राज्य सरकारच्या मालकीची आहे. अशा या एकत्रित जमिनीचा विकास करण्यासाठी एमएमआरडीएला ‘विशेष नियोजन प्राधिकरण’ म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव प्राधिकरणाच्या नुकत्याच नागपुरात झालेल्या १५५व्या कार्यकारी समितीच्या बैठकीत होता. मात्र त्यावर चर्चा न झाल्याने त्यास अद्याप अंतिम मंजुरी मिळाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

तरुणीला अनुकंपा तत्त्वावर नोकरी, आजीच्या सांभाळाची अट गैर, पोलीस प्रशासनाला मॅटचा दणका

…असा होईल विकास

या ३,४२७ एकर व्यावसायिक संकुले, चित्रपटनिर्मितीसाठी फिल्मसिटी, पर्यटनाच्यादृष्टीने सोयीसुविधा, उद्याने, मिनी थिएटर, मनोरंजन केंद्र उभे होणार आहे. मात्र ही संपूर्ण जागा किनारपट्टीला लागून असल्याने किनारपट्टी नियमन क्षेत्रात येत आहे. तसे असले तरीही त्यातील जवळपास २,३०० एकर जागा विशेष विकास क्षेत्र म्हणून निश्चित केल्याने हे व्यावसायिक केंद्र विकसित करणे शक्य होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची वेळ येणार नाही, त्यापूर्वी मराठा समाजाला न्याय मिळेल | गिरीश महाजन

Read Latest Maharashtra Updates And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.