
Tej Police Times
दिवसाला ७० हजार तर महिन्याला २१ लाखांचा तोटा, छ. संभाजीनगरातील जवळपास ८० टक्के गाव संकटात
यावेळी उपोषणस्थळी आलेल्या बबनराव तायवाडे यांनी जरांगे यांनी मुंबईत ३ कोटी मराठे येतील या केलेल्या विधानाचा समाचार घेतला असून मुंबईत घेऊन जाण्यासाठी राज्यात मराठ्यांची संख्या ३ कोटी तरी आहे का? असा खोचक सवाल उपस्थित केला आहे. त्याच बरोबर सरकारने मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिलं तर मराठा समाजापेक्षाही मोठ आंदोलन करू. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का? सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दांत फेरफार केली तर रस्त्यावर उतरू असा गर्भित इशारा दिला आहे. ते वडीगोद्री इथे बोलत होते. तसेच जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार आता कमी झाली आहे, असा टोलाही तायवाडे यांनी यावेळी लगावला आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.