
Tej Police Times
“हवा बहुत तेज चल रही है,अजितराव! टोपी उड जायेगी “
अजित पवार यांनी गेल्याच आठवड्यात शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे यांना पाडणारच असे विधान केले होते. यावर संजय राऊत यांनी भाषणात अजित पवार यांची मिमिक्री करतच प्रतिक्रिया दिली. “हवा बहुत तेज चल रही है, अजितराव. टोपी उड जायेगी” असे सांगून शिरूर मध्ये कोल्हेंचीच हवा असल्याचे राऊत यांनी अधोरेखित केले. आमच्या पाडापाडीच्या खेळात तुम्ही पडाल, तर आधी तुम्ही पडाल असा इशारा संजय राऊत यांनी दिला. आज महाराष्ट्र, शेतकरी लुटला जातोय. महाराष्ट्राने देशाचे पोट भरले आहे. मात्र, आज महाराष्ट्रात बेरोजगारी. येणारा प्रत्येक उद्योग गुजरातला जातोय. त्यापेक्षा एकदा गुजरातला सोन्याने मढवून टाका, आमचे काही म्हणणे नाही. उद्योग न्याल, मराठी माणसाचे मनगट कसे न्याल. आम्ही पुन्हा लढू आणि साम्राज्य उभे करू . धैर्य, शौर्य, अभिमान आमच्या रक्तात आहे, असे राऊत म्हणाले.
आक्रोश मोर्चानंतर परिस्थिती सुधारली नाही, तर हल्लाबोल मोर्चा काढावा लागेल. कांदा आणि साखरेच्या दरवाढीने शेतकऱ्याला चार पैसे मिळतील, असे वाटले होते. मात्र, केंद्र सरकारने कांद्याची निर्यात बंदी आणि इथेनॉल उत्पादन बंदीचा निर्णय घेऊन सरकारने शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याचा प्रयत्न केला आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश एवढ्या पुरता मर्यादित राहू नये. सरकारने शेतकऱ्याच्या खिशात हात घालू नये. गावोगाव तरुण बेरोजगार, त्यांच्या हाताला काम नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
महाराष्ट्रातील सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात की हे शेतकऱ्यांचे सरकार आहे मात्र, केंद्र सरकारने सात डिसेंबरला कांद्याची निर्यात बंदी केली. त्याला आज २३ दिवस झाले. मात्र, सरकारमधील एकानेही केंद्र सरकारच्या डोळ्याला डोळा भिडवून प्रश्न मांडले नाहीत. पालकमंत्री पद, मंत्रिमंडळ विस्तार यासाठी दिल्लीला धाव घेता येते. शेतकऱ्यांसाठी नाही. सत्तेत बसलेल्या नेत्याजी लाचारीची झूल पांघरली का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाची टीका अमोल कोल्हे यांनी केली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.