
Tej Police Times
ग्रामस्थांसाठी बौद्धिक सत्र
या शिबिरांमध्ये विविध उपक्रम राबविण्यासोबतच ग्रामस्थांसाठी बालविवाह थांबविण्यासाठी एक दिवसाचे बौद्धिक सत्र आयोजित करावे लागणार आहे. अशा बौद्धिक सत्रांमध्ये राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच युनिसेफ आणि सेंटर फॉर सोशल अँड बिहेविअर चेंज या संस्थेचे कर्मचारी मार्गदर्शन करणार आहेत.
पुण्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; जिल्हा बॅंकेची खास योजना, आकस्मिक गरजांसाठी मिळेल कर्ज
नाशिक जिल्ह्यात ३० टक्के
नाशिक जिल्ह्यात दरवर्षी ३० टक्के बालविवाह होत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत गेल्या वर्षी जाहीर करण्यात आली होती. बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत जाहीर करण्यात आले होते. त्याचसोबत आता ‘रासेयो’ शिबिरांमध्येदेखील जनजागृती केली जाणार आहे.
‘रासेयो’मार्फत शिबिरे सुरू करण्यात आली आहेत. फेब्रुवारीपर्यंत ही शिबिरे सुरू राहणार आहेत. यंदाची शिबिरांची थीम लोकसंख्या नियंत्रण आहे. अद्याप विद्यापीठामार्फत बालविवाह रोखण्यांसदर्भातील उपक्रमांबाबत प्रत्यक्ष सूचना मिळालेल्या नाहीत. सूचना मिळाल्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाईल.-गोरख पिंगळे, जिल्हा समन्वयक, ‘रासेयो’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Recover your password.
A password will be e-mailed to you.