Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कोकणच्या विकासासाठी ५०० कोटी, मुंबई-गोवा महामार्ग कधी पू्र्ण होणार? मुख्यमंत्री म्हणाले…..

8

म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमातून आत्तापर्यंत दोन कोटी एक लाख ९१ हजार ८०३ लाभार्थींना प्रत्यक्ष लाभ दिले आहेत. २६ लाख लाभार्थींना १७०० कोटी लाभ रायगड जिल्ह्यात दिले आहेत. कोकण क्षेत्र विकास प्राधिकरणासाठी ५०० कोटींची तरतूद केली आहे. कोकणात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी २० हजार कोटींचा नवा उद्योग येतोय. मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २४पर्यंत पूर्ण होईल, असे सांगतानाच, माणगाव नगरपरिषद बांधकामासाठी १५ कोटी, पावनखिंड येथे जाणाऱ्यांच्या विश्रामधामासाठी १५ कोटी दिले जातील, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्या.

येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशात्र विद्यापीठ लोणोरे येथे ‘शासन आपल्या दारी’कार्यक्रमाचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील विविध विभागांच्या लाभार्थ्यांना विविध लाभांचे वाटप करण्यात आले. तळीये दुर्घटनाग्रस्तांना घराच्या चाव्यांचे मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तसेच पनवेल महापालिकेच्या एकत्रित मालमत्ता हस्तातरण प्रणालीचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. ‘निर्णय वेगवान, गतिमान सरकार’अशा पध्दतीने कामकाज सुरूअसल्याचे सांगून, कोकणच्या विकासासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

शिंदे गटाच्या आमदारांच्या ताफ्यातील वाहनाला अपघात; नऊ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

‘रायगड राज्याच्या विकासाचे केंद्र ‘

गेली ५० वर्षे महाराष्ट्राचा विकास मुंबईमुळे झाला, तर पुढची २५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र रायगड जिल्हा हा असणार आहे. आधुनिक जगात डेटा सर्वात महत्त्वाचा आहे. डेटाची किंमत तेलापेक्षाही जास्त झाली आहे. डेटाच्या विकासाचा केंद्रबिंदू हा रायगड जिल्हा असणार आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा करतो आहोत. मोठ्याप्रमाणात या भागात गुंतवणूक आलेली पाहायला मिळणार आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

‘तिसरी मुंबई तयार होतेय’

कोकणाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. या भागात तिसरी मुंबई तयार होत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील लोकांनी जमिनी विकू नयेत, असेही आवाहनही त्यांनी यावेळी केले.

उद्धव ठाकरेंना बीडमध्ये मोठा धक्का, सहसंपर्क प्रमुखांसह ३५ सरपंच शिंदेंच्या ताफ्यात, काय घडलं?

Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.