
Tej Police Times
निवडणुकीतील युतीशी फारकत घेत, सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन करण्याची प्रवृत्ती लोकशाहीला मारक ठरणारी होती. आजच्या निकालानंतर तसे प्रकार थांबतील. आजच्या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
आमदार अपात्रतेचा निर्णय विरोधात गेला असला तरी एकत्र राहून लढू, प्रकाश आंबेडकरांची उद्धव ठाकरेंना साथ
पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे. लोकशाहीत राजकीय पक्षही लोकशाही पद्धतीनेच चालले पाहिजेत, पक्षाध्यक्ष सुद्धा मनमानी करू शकत नाही , हे या निकालाने अधोरेखित केले आहे. अत्यंत पुरोगामी आणि राजकीय नेत्यांना जबाबदारीचे भान देणारा हा निकाल आहे, असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
ईशान किशान आणि श्रेयस अय्यर यांना संघाबाहेर का काढलं, राहुल द्रविड यांनी स्पष्टच सांगितलं…
मतदारांच्या मताचा सन्मान करणारा आणि लोकशाहीत त्याचा निर्णयाधिकार अबाधित ठेवणारा हा निकाल आहे. सत्तेसाठी विचारांची मोडतोड करू, अनैसर्गिक आघाड्या करून आणि विश्वास पायदळी तुडवून त्यावर ताठ मानेने उभे राहण्याचा घोर अपराध करणाऱ्या नेत्यांना या निकालाने धडा दिला आहे, असं एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलं.
निवडणूक आयोग म्हणजे चोरांचा सरदार आणि आजचा निकाल म्हणजे मॅच फिक्सिंग पण शिवसेना संपणार नाही : संजय राऊत
Read Latest Maharashtra News And Marathi News
Recover your password.
A password will be e-mailed to you.