
Tej Police Times
गोदावरीच्या उगमस्थानी नदीस्वच्छतेबाबत उदासीनता आहे. नदीपात्रात सांडपाणी सोडण्यात येणार नाही यासाठी राज्य शासन ३९ कोटी रुपयांची भुयारी गटार योजना आणि सांडपाणी प्रकिया प्रकल्प राबवत आहे. अडीच वर्षांपासून हे काम सुरू आहे. दरम्यानच्या कालावधीत दोन कोटी रुपयांचा तात्पुरता फॅब्रिकेटेड प्रकल्प करण्यात आला आहे. तथापि नदीपात्रातील पाण्याची अवस्था पाहता सांडपाणी शुद्ध होत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. हरित लवादाने यापूर्वीच दंडात्मक कारवाई करीत नदीपात्राच्या शुद्धतेबाबत गांभीर्य बाळगण्याचे वेळोवेळी स्पष्ट केलेले असतानाही त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाजूने असलेल्या नदीपात्राची अवस्था पाहता स्थानिक प्रशासनाला याचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
म. टा. प्रतिनिधी यांच्याविषयी
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Recover your password.
A password will be e-mailed to you.