
Tej Police Times
सद्यस्थितीत राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ५८.८४ टक्के इतकाच जलसाठा उपलब्ध आहे. यात छत्रपती संभाजीनगर विभागाची स्थिती सर्वांत बिकट आहे. त्याखालोखाल नागपूर विभागातील पाणीसाठा असून, विभागातील एकूण ३८३ धरणांमध्ये ६६.०३टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यातील एक मोठे धरण म्हणून सोलापुरातील उजनी धरणाची ओळख आहे. यातील पाणीसाठ्यानेही तळ गाठला आहे. लवकरच धरणाचा मृतसाठा वापरण्याची वेळ येणार आहे. कोकण विभागातील ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग भागातील धरणांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा आहे.
बीड पाणीटंचाईचे सावट; साठ प्रकल्पांतील पाणी जोत्याखाली, २१ तलाव कोरडे
मुंबईत तूर्त ‘पाणीबाणी’ नाही
मुंबईला पाणीसाठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा तुलनेने समाधानकारक असून वैतरणा (९५.९० टक्के) भातसा (७३.१२ टक्के), मोडकसागर (६०.०३ टक्के), मध्य वैतरणा (३२.७८ टक्के) आणि तानसा (७३.०३ टक्के) इतका पाणीसाठा शुक्रवारी उपलब्ध होता. त्यामुळे सध्यातरी मुंबईकरांपुढे पाण्याची समस्या दिसत नाही.
धरण-सध्याचा साठा (टक्के)-मागील वर्षीची स्थिती (टक्के)
उजनी-८.०३-१००
जायकवाडी-४२.११-८९.८७
गोसीखुर्द-५६.२२-५४.८७
तोतलाडोह-७२.४६-८१.०५
इसापूर-७०.११-९०.३५
कोयना-७२.९८-८२.९७
Recover your password.
A password will be e-mailed to you.