
Tej Police Times
मात्र हे सगळे जाणीवपूर्वक केले असल्याचा आरोप आ. थोरवे यांनी महाराष्ट्र टाइम्स जवळ बोलताना सांगितले. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप यांची युती अभेद्य आहे. मात्र राष्ट्रवादीला हिंदुत्व मुद्दा पटला पाहिजे, असे सांगून राज्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी तसे नियोजन करणे आवश्यक असून महायुतीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी नम्रता अंगी आणली पाहिजे, असा अप्रत्यक्ष खोचक टोला त्यांनी खा. तटकरे यांना लगावला.
महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन झाले नसल्याने स्थानिक निवडणुकांमध्ये याचा फटका बसला असल्याची यावेळी भावना व्यक्त केली. केवळ लोकसभा निवडणुकीपूर्ती मर्यादित महायुती नसावी तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक महायुतीने एकत्रित येऊन लढवाव्यात असा सूर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी यावेळी लावला होता. जी-२० परिषद यशस्वी केल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधान मोदींचे साधे अभिनंदन केले नसल्याचे मत खा. सुनील तटकरे यांनी व्यक्त केले. आपला देश केवळ मोदींमुळेच पुढे जात असल्याचे कौतुकोउद्गार त्यांनी या मेळाव्यात काढले.
शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं? त्यांच योगदान काय ते त्यांनी सांगावं | नारायण राणे
महायुतीमध्ये १५ घटक पक्ष असून एकाच दिवशी ३६ जिल्ह्यात समन्वय मेळावे घेण्याचे काम सुरू आहे. या राजकीय पक्षाच्या समन्वयात आगामी निवडणूक लढविणार असल्याचे खा. तटकरे यांनी सांगून रायगड जिल्ह्याबद्दल बॅ. अंतुले यांचे स्वप्न महायुती पूर्ण करणार असल्याचे सांगितले. आगामी काळात महायुतीचे सरकार आणायचे असेल तर सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे असून जिल्ह्यातील सात आमदार आणि दोन खासदार मोठ्या फरकाने निवडून आणू शकतो. मात्र निवडून आल्यावर तुम्ही कोण आम्ही कोण असे वागू नका. तिघेही एकत्र असलो तर जनता आपले स्वागत करेल, असे आमदार भरत गोगावले यांनी यावेळी सांगितले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.