तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

दुर्गंधी, गलिच्छपणा अन् धुळीच्या लोटामुळे प्रवासी हैराण; तरीही पनवेलला स्वच्छ स्थानकाचा मान

0 27

म. टा. वृत्तसेवा, पनवेल: स्वच्छतागृहांबाहेर आणि फलाटांवर चालताना जाणवणारी दुर्गंधी… प्रवेशद्वारांवर गलिच्छ भिकारी, गर्दुल्ल्यांचा वावर… स्थानक परिसरातील कामांमुळे उडणारे धुळीचे लोट… अशा अस्वच्छ वातावरणाने पनवेल रेल्वे स्थानकाला विळखा घातला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या दाखल होणाऱ्या रेल्वे स्थानकाची अस्वच्छता आणि अव्यवस्था यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत. परंतु त्याच पनवेल रेल्वे स्थानकास मध्य रेल्वेच्या ‘अ’ दर्जाच्या स्थानकांमधील सर्वांत स्वच्छ स्थानकाचा सन्मान देण्यात आला आहे. स्थानकातील परिस्थिती आणि मिळालेला गौरव यातील विरोधाभासामुळे स्थानिक प्रवाशांकडून मात्र याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ठाणे, विरार, अंधेरी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदी लोकल स्थानकांसह देशातील महत्त्वाच्या मोठ्या स्थानकांमध्ये धावणाऱ्या शेकडो पॅसेंजर आणि लांब पल्ल्याच्या गाड्या पनवेल स्थानकातून धावतात. जेएनपीटीला देशाशी जोडणाऱ्या मालवाहू रेल्वेमुळे देशभर ख्याती असलेल्या पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या या स्थानकास मध्य रेल्वे प्रशासनाने स्वच्छतेसाठी सन्मानित केले. परंतु या रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांनी या स्वच्छ स्थानकाच्या कौतुकावरून संताप व्यक्त केला आहे.

पनवेल स्थानकातून जुन्या पनवेल दिशेला जाणाऱ्या मार्गावरील अस्वच्छ स्वच्छतागृह, थुंकीबहाद्दरांनी रंगवलेल्या भिंती आणि धुळीमुळे निर्माण होणारे प्रदूषण यामुळे या भागातून प्रवास करणारे प्रवासी असंख्य समस्यांनी ग्रस्त आहेत. विशेष म्हणजे लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणाऱ्या रेल्वे रुळांवरील दुर्गंधीमुळे फलाटांवर उभे राहणेही प्रवाशांसाठी अडचणीचे ठरते आहे. रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर त्या ठिकाणी भिकारी, गर्दुल्ले, रिक्षाचालकांचा कोंडाळा यामुळे येथे येणाऱ्या प्रवाशांचा गोंधळ उडतो. ही परिस्थिती कधी सुधारणार, असा प्रश्न येथे येणाऱ्या प्रवाशांना सतावतो. त्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकाच्या स्वच्छतेवरून प्रवाशांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे.

ज्याच्या धाकाने कोथरुड थरथर कापायचं, कुख्यात गुंड शरद मोहोळचा भरदिवसा करेक्ट कार्यक्रम

स्थानकात अडथळ्यांची शर्यत

पनवेल रेल्वे स्थानकातून पूर्वेला म्हणजेच नवीन पनवेलकडे जाण्याऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तरीही लोकलच्या फलाटावर नवीन पनवेलच्या दिशेने जाण्यासाठी केवळ एक पादचारी पूल आहे. ऑफिसच्या वेळी आणि सायंकाळी प्रवासी घरी परतण्याच्या वेळेला पादचारी पुलावर खूप गर्दी होते. प्रवाशांना या अरुंद पुलावरून गर्दीतून प्रवास करावा लागतो. पादचारी पुलाच्या पायऱ्या उतरताना महिला, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीत गैरसोय होते. फलाट क्रमांक १ ते ३ वर लोकल स्थानकावरून नवीन पनवेलकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम रखडले आहे. भुयारी मार्ग सुरू झाल्यास प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे. ७, ८ आणि ९ या नव्या फलाट उभारणीचे काम अर्धवट असल्यामुळे भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्यामुळे फलाट क्रमांक ४ आणि ५ वर नव्याने शौचालय बांधल्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. फलाट क्रमांक ६ आणि ७ वर एस्कलेटर बनविणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाकडून येथे लिफ्टची सोय केली जात आहे.

बंद तिकीटखिडकी

लांब पल्ल्याच्या गाड्यांची तिकिटे काढण्यासाठी असलेली खिडकी लोकल स्थानकात स्थलांतरित केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय वाढत आहे. यापूर्वी या भागात तिकिटासाठी होणारी गर्दी आता लोकल स्थानकाच्या तिकीट खिडक्यांवर जात असल्यामुळे तिकिटे काढण्यासाठी गर्दी वाढू लागली आहे. शिवाय, बंद तिकीट खिडकीच्या आसपास आता लांब पल्ल्याचे प्रवासी आसरा घेऊ लागल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य वाढू लागले आहे.

मुलाला मारण्याआधी गायली अंगाई; कफ सिरप, डॉक्टरांना फोन अन्.. सूचनाने चौकशीत काय-काय सांगितलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News
undefined

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.