
Tej Police Times
ठरलं, जरांगे मुंबईला येणार, प्रजासत्ताकदिनी उपोषण, अंतरवाली ते मुंबई ८ दिवसांचा सगळा प्लॅन, वाचा…
बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांना झापलं
सात हजार गावांमध्ये कुणबी नोंदी तपासल्या नाहीत, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच कुणबी नोंदी मिळाल्या आहेत तरी सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. जरांगे यांच्या आरोपानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुरकरराजे आर्दड यांना फोन करून जाब विचारला. कलेक्टर काय झोपा काढतायेत का? काम होत नसेल तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, अशी धमकीच दिली.
जास्त दिवस घोंगड भिजत ठेवले, तर ते वास मारतेच; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर
ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या त्या गावातील ग्रापंचायत कार्यालयावर ती यादी लावावी, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र गावपातळीवर कारवाई होत नसल्याचे समोर येताच आमदार बच्चू चांगलेच आक्रमक झाले. अंबड तालुक्यातील वडिकाळ्या गावात नोंदी सापडून देखील त्या ग्रामपंचायत कार्यालयावर याद्या लावल्या नसल्याचं कडू यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर माञ आमदार बच्चू कडू यांनी थेट विभागीय आयुक्तांना फोन करून चांगलंच धारेवर धरलं.
आम्हाला इथे मरायला पाठवता का?
७५ टक्के गावात नोंदी लावल्या नाहीत. पत्र काढून कलेक्टर काम करत नाही. एसडीओ काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही, आम्हाला कशाला मरायला पाठवता का मग इथं? असं म्हणत विभागीय आयुक्तांना त्यांनी धारेवर धरलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.