Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कामं झाली नाही तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, आम्हाला इथे मरायला पाठवता का? बच्चूभाऊ संतापले

9

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच करण्यास सज्ज झालेल्या मनोज जरांगे पाटील यांना थोपविण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची अंतरवाली सराटीत जाऊन भेट घेतली. कुणबी नोंदी असूनही सरकार त्यांना दाखले देत नाही, अशी तक्रार मनोज जरांगे यांनी शिष्टमंडळाला बोलून दाखल्यानंतर शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू अधिकाऱ्यांवर चांगलेच संतापले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांना फोन लावून कलेक्टर काय झोपा काढतायेत का? अशा शब्दात सुनावलं. तहसीलदार काम करत नसतील तर त्यांच्या कानफटीत लावेन, असा इशाराही त्यांनी दिला.

आमदार बच्चू कडू आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मराठी आरक्षणासाठी लढा उभा करणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांना कुणबी दाखले देण्याची सरकारची भूमिका आहे, असं शिष्टमंडळाने सांगितलं. तसेच मुंबईला मोर्चा आणू नका, आता आंदोलन करू नका, शासन तुमच्या मागण्या पूर्ण करतंय, अशी विनंती शिष्टमंडळाने केली. परंतु शासनाने आदेश देऊनही प्रशासकीय अधिकारी शासनाचे आदेश हलक्यात घेत आहेत, अशी तक्रार जरांगे यांनी केली.

ठरलं, जरांगे मुंबईला येणार, प्रजासत्ताकदिनी उपोषण, अंतरवाली ते मुंबई ८ दिवसांचा सगळा प्लॅन, वाचा…
बच्चू कडू यांनी विभागीय आयुक्तांना झापलं

सात हजार गावांमध्ये कुणबी नोंदी तपासल्या नाहीत, असा आरोप जरांगे यांनी केला. तसेच कुणबी नोंदी मिळाल्या आहेत तरी सरकारकडून प्रमाणपत्र दिले जात नाही, अशी तक्रारही त्यांनी केली. जरांगे यांच्या आरोपानंतर आमदार बच्चू कडू आक्रमक झाले. त्यांनी थेट विभागीय आयुक्त मधुरकरराजे आर्दड यांना फोन करून जाब विचारला. कलेक्टर काय झोपा काढतायेत का? काम होत नसेल तर तहसीलदारांच्या थोबाडीत मारेन, अशी धमकीच दिली.

जास्त दिवस घोंगड भिजत ठेवले, तर ते वास मारतेच; उदयनराजेंचा सरकारला घरचा आहेर
ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या त्या गावातील ग्रापंचायत कार्यालयावर ती यादी लावावी, असा आदेश काढण्यात आला होता. मात्र गावपातळीवर कारवाई होत नसल्याचे समोर येताच आमदार बच्चू चांगलेच आक्रमक झाले. अंबड तालुक्यातील वडिकाळ्या गावात नोंदी सापडून देखील त्या ग्रामपंचायत कार्यालयावर याद्या लावल्या नसल्याचं कडू यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर माञ आमदार बच्चू कडू यांनी थेट विभागीय आयुक्तांना फोन करून चांगलंच धारेवर धरलं.

आम्हाला इथे मरायला पाठवता का?

७५ टक्के गावात नोंदी लावल्या नाहीत. पत्र काढून कलेक्टर काम करत नाही. एसडीओ काम करत नाही, तहसीलदार काम करत नाही, आम्हाला कशाला मरायला पाठवता का मग इथं? असं म्हणत विभागीय आयुक्तांना त्यांनी धारेवर धरलं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.