Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भरधाव ट्रकने ७ दुचाकी ४ चारचाकी १ रिक्षाला उडवले; भीषण अपघात एकाचा मृत्यू

8

छत्रपती संभाजीनगर: वाहतूक कोंडीमुळे अडकलेल्या ६ दुचाकी, ४ चाकी, १ रिक्षाला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने उडवले. यामध्ये १५ ते २० जण जखमी झाले असून यात एका महिलेचा मृत्यू झाल्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात पैठण रोडवरील वाल्मी नाका येथे घडली.

दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर शहरातील वाल्मी नाका पैठण रोड येथे रस्त्याचे काम सुरू आहे. दररोज सायंकाळी रस्त्याचे काम केले जात असल्यामुळे त्या ठिकाणी नियमित वाहतूक कोंडी होते. शुक्रवार सायंकाळी सहाच्या सुमारास वाहतूक कोंडी झाली. यावेळी भरधाव वेगात असलेल्या एका ट्रकने रस्त्यावर उभे असलेल्या वाहनांना उडवले यामध्ये ७ दुचाकी, ४ चारचाकी व एक रिक्षाला धडक दिली. यात दुचाकी वाहनांचा अक्षरशा चुराडा झाला.

या भीषण अपघातामुळे परिसरामध्ये एकच गर्दी झाली होती. प्राथमिक माहितीनुसार एक महिला मृत्यू झाला असून यामध्ये जवळपास १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. यापैकी मृत महिलेला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काही जखमींना खाजगी व काहींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाल्मी नाका येथे रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी काम सुरू असते. सायंकाळच्या वेळी या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी झाल्यामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.