
Tej Police Times
वाल्मिकी श्रृंग घराण्याचा कवी, त्यांना जसं आवडलं तसं वाल्मिकींनी रामायण लिहिलं, वाल्मिकींचा राम कशामुळे खरा? : नेमाडे
या पार्श्वभूमीवर ‘ ३०० रामायणे ‘ या पुस्तकाच्या माहितीच्या आधारे भालचंद्र नेमाडे यांनी मत व्यक्त करणे योग्य आहे ? नेमाडेंचा परिचय इतिहास संशोधक म्हणून अथवा रामायणाच्या अभ्यासक म्हणून नाही. ३०० रामायणे या पुस्तकाचे मूळ प्रकाशन ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेस विभागाने केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल ऑक्सफर्ड विद्यापीठाने खेद व्यक्त केला होता; त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाला जे कळतं ते भालचंद्र नेमाडे यांना कळत नाही का ? भालचंद्र नेमाडे जाणीवपूर्वक डाव्या विचारांवरील आपली निष्ठा आणि पुरोगामी तो सिद्ध करण्यासाठी ३०० रामायाने या ग्रंथाचा आधार घेत आहेत. हे पुस्तक दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमातून इतिहासतज्ञांच्या अहवालाच्या आधारे रद्द केला. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाने या ग्रंथाचे प्रकाशन वितरण आणि रद्द केली आहे असे असतानाही हिंदू धर्मियांच्या रामाबाबतच्या असलेल्या श्रद्धा दुखावल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी आणि डॉ. गुळेद यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
भालचंद्र नेमाडे यांच्याबाबत आदर आहे. ते साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी इतिहासकारांच्या भूमिकेत जाऊ नये. नेमाडे यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे वादग्रस्त विधाने तातडीने थांबवावीत. नेमाडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.
Recover your password.
A password will be e-mailed to you.