
Tej Police Times
मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातलं आरक्षण न देता त्यांना स्वतंत्र वाढवून द्यावं, अशी आमची भूमिका आहे. एवढी मोठी संख्या जर ओबीसी आरक्षणात आली तर संबंध महाराष्ट्र आरक्षणामध्ये आल्यासारखं होईल. त्यामुळे मग ब्राह्मण समाजाला तर का बाहेर ठेवायचं? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
जरांगेंची मागणी अनैतिक, आरक्षण मागायची वेळ का आली याचा विचार करा, लक्ष्मण मानेंची टीका
मनोज जरांगे पाटील यांची सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी आहे. मग छत्रपती उदयनराजे, शिवेंद्रराजे, रामराजे आणि सरदारांची घराणी यांना देखील कुणबीचं सर्टिफिकेट देणार का असा सवाल त्यांनी केला.
आरक्षण घेणाऱ्या खालच्या जातीच्या लोकांच्या हाताखाली आम्हाला काम करावे लागतं असं जरांगे म्हणत असेल तर मग ते आरक्षणाची मागणी करून खालच्या जातीच्या लोकांसोबत का येत आहेत? माणूस एकतर घटनावादी असू शकतं किंवा मनुवादी असू शकतो. जरांगे पाटील हे मनुवादी आहेत. त्यांच्या आंदोलनामध्ये शाहू फुले आंबेडकरांचे कुठलेच फोटो दिसत नाहीत, असं माने म्हणाले.
दोन महिन्यांचं रेशन सोबत घेऊन आलोय, आरक्षण घेऊनच मुंबई सोडणार; मराठा बांधवांचा निर्धार
Recover your password.
A password will be e-mailed to you.