
Tej Police Times
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे
शिवरायांचे आठवावे रूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप!
हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या आणि रयतेच्या कल्याणासाठी झटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भक्कम गड किल्ल्यांची बांधणी करून सक्षम राज्य निर्माण केले. हे गडकिल्ले स्वराज्याची शान आणि महाराष्ट्राच्या समृद्धीचे द्योतक आहेत. गेली अनेक शतके ताठ मानेने उभे असलेल्या या गड किल्ल्यांवर ऐतिहासिक वारशाची मोहोर उमटवण्याचा प्रयत्न सुरू असून महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूच्या जिंजी किल्ल्याला युनेस्को वर्ल्ड हेरिटेज लिस्ट २०२४-२५ मध्ये नामांकन मिळाले आहे. साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या महाराष्ट्रातील शिववारशाला जागतिक ओळख मिळू शकणार आहे.
युनेस्कोच्या प्रतिष्ठित व्यासपीठावर महाराष्ट्राला नामांकन मिळणे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. महाराष्ट्रातील गड किल्ल्यांना नामांकन मिळाल्याने पहिली पायरी सर झाली आहे. या किल्ल्यांना असलेला शौर्य, पराक्रम आणि रयतेच्या कल्याणाचा वारसा आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता, त्यावर अंतिम मोहोरही उमटेल, अशी मला खात्री वाटते.
छत्रपती शिवाजी महाराज की जय!
जय जिजाऊ, जय शिवराय!
जय महाराष्ट्र!
घर की किल्ला? पुण्यातील शिवप्रेमी युवकाची कमाल; उभारलं चक्क किल्ल्याचं घर
Recover your password.
A password will be e-mailed to you.