
Tej Police Times
‘सकट चौथ’चे महत्त्व
‘सकट चौथ’ म्हणजे संकट दूर करणारी गणेश चतुर्थी असे म्हटले जाते. गणपतीला विघ्नहर्ता असे म्हणतात, त्यामुळे सकट चौथच्या दिवशी उपवास केल्यामुळे आयुष्याचील संकटे आणि अडथळे दूर होते अशी मान्यता आहे. या दिवशी उपवास करणाऱ्या महिलांसाठी उपवास आणि व्रत कथा महत्त्वाची मानली जाते. या कथेचे पठण केल्यानंतरच व्रत पूर्ण मानले जाते.
‘सकट चौथ’ व्रत विधी
‘सकट चौथ’च्या दिवशी महिला सकाळी आंघोळ करून उपवास करतात. रात्री चंद्राचं दर्शन घेतल्यानंतर उपवास सोडला जातो. काही ठिकाणी स्त्रिया आजच्या दिवशी काहीही खात नाहीत. काही ठिकाणी महिला उपवास सोडल्यानंतर खिचडी, शेंगदाणे आणि फलाहार करतात. या दिवशी रताळे खाणे सर्वात महत्वाचे आहे. या व्रतात काळे तीळ आणि गुळापासून बनलेले खाद्यपदार्थ, तांदूळाचे पीठ असा नैवेद्य गणपतीला दाखवला जातो.
Recover your password.
A password will be e-mailed to you.