
Tej Police Times
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत पत्नीनेच घटनेची तक्रार दिली होती. पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार, पती मयत योगेश सुभाष शेळके हे झोपलेले असताना त्यांचे गळ्यावर, हातावर, उजव्या पायावर कोयत्याने वार करुन त्यांना जीवे ठार मारले. तसेच फिर्यादीच्या गळ्याला कोयता लाऊन आरडा ओरडा केल्यास तिलाही जीवे मारण्याची धमकी दिली. यावरून बेलवंडी पोलीस स्टेशन गु.र.नं. ३७/२०२४ भादविक ३०२, ४५२, ५०६, ३४ आर्म ऍ़क्ट ४/२५ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना गंभीर स्वरुपाची असल्याने राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी घटना ठिकाणास भेट देऊन पोनि/दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुन्हा उघडकीस आणून आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यास सांगितले होते.
महिला कामावरुन परतत होती; अचानक तरुणानं पाठलाग केला, नंतर जे घडलं त्यानं परिसर हादरला
पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे २ विशेष पथकं तयार करुन रवाना केली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आजुबाजूला विचारपूस केली असता घटनाक्रम पाहता पत्नीवरच पथकाचा संशय बळावला होता. परंतु सुरुवातीला तांत्रिक विश्लेषणात घटनेला कोणताही आधार मिळत नसल्याने मयताचे घरी नेहमी येणारे तसेच त्याच्यासोबत दारु पिणारे ४ ते ५ इसमांना पथकाने ताब्यात घेतले होते. पत्नी आरतीने पण वरील ताब्यात घेतलेल्या इसमांचा समावेश असल्याचे सांगून पथकाची दिशाभुल केली होती. तरीही पथकाला घटनेच्या सत्यतेबाबत तसेच फिर्यादी सांगत असलेल्या आरोपींबाबत खात्री पटत नव्हती.
साधारण दोन दिवस कोथूळ गावातून माहिती गोळा करताना तसेच तांत्रिक विश्लेषणादरम्यान मयताचा भाचा शुभम लगड याच्या मोबाईलवर रोहित साहेबराव लाटे (२३) याचा घटनेच्या दिवशी सकाळी कॉल आलेला दिसून आला. त्याप्रमाणे पथकाने पुणे येथे जाऊन रोहित लाटे याला विश्वासात घेऊन त्याचेकडे विचारपुस केली. त्यावेळी त्याने मयताची पत्नी आरती आणि त्याचे प्रेमाचे संबंध होते. त्यावरुन मयत योगेश हा त्यांच्या अनैतिक संबंधाचे संशयावरुन आरतीस नेहमी दारु पिऊन शिवीगाळ आणि मारहाण करीत होता.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बँड आणि बग्गीसह पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना निरोप दिला
यामुळे दोघांनी मागील १५ दिवसापुर्वी नियोजन करुन इसम अनिश सुरेंद्र धडे (१९) याच्या मध्यस्थीने पृथ्वीराज अनिल साळवे, (१९), विराज सतिष गाडे (१९), शोएब महमंद बादशाह (२२) आणि आयुष शंभु सिंह (१८) यांना दीड लाख रुपये देण्याचे कबुल करुन त्यांच्या मदतीने २ मोटार सायकलवर येऊन ही हत्या केल्याचे सांगितले. तसेच रोहित आणि आरती यांच्यातील संबंधाची कोणाला माहिती मिळू नये, म्हणून स्नॅपचॅट या सोशल मिडीया ऍ़पचा वापर करुन ते संपर्क साधत असल्याचे समोर आले होते. आरोपींचा शोध घेतल्यानंतर त्यांना विविध ठिकाणावरुन ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणी आरती योगेश शेळके (२६), रोहीत साहेबराव लाटे (२३), शोएब महमंद बादशाह (२२), विराज सतिष गाडे (१९), आयुष शंभु सिंह (१८), पृथ्वीराज अनिल साळवे (१९), अनिश सुरेंद्र धडे (१९) यांना ताब्यात घेऊन बेलवंडी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. या प्रकरणी पुढील तपास बेलवंडी पोलीस स्टेशन करत आहेत.
Recover your password.
A password will be e-mailed to you.