
Tej Police Times
जिल्ह्यात गेले तीन दिवस पाऊस कायम आहे. शहरात काही काळ पावसाची उघडीप असली तरी धरणक्षेत्रात तो जोरात कोसळत आहे. राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा या तालुक्यात पावसाचा जोर जास्त आहे. यामुळे धरणातील पाणी साठा वाढला आहे. बहुसंख्य धरणे शंभर टक्के भरली आहे. राधानगरी धरणाचे दरवाजे तिसऱ्यांदा उघडले आहेत. आज चार दरवाजे उघडल्याने ५६८४ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
coronavirus latest update दिलासा! राज्यात आज करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली; पाहा, ताजी स्थिती!
संततधार पाऊस आणि धरणाचे दरवाजे उघडल्याने नदी, ओढे, नाले यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नद्या ओसंडून वाहू लागल्याने जिल्ह्यातील १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी पंचवीस फुटावर पोहोचली आहे.
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातीलही अनेक जिल्ह्यांना पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.