
Tej Police Times
वाचा: किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध; ‘त्या’ नोटीसवरून उठलं मोठं वादळ
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्याअनुषंगाने ते कोल्हापूर दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्याआधीच त्यांना आज मुंबईतील निवासस्थानी स्थानबद्ध करण्यात आले व नंतर घराबाहेर जाऊ देण्यात आले. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांचे समर्थन करत ठाकरे सरकारवर थेट शब्दांत निशाणा साधला. किरीट सोमय्या यांच्यावर कोणता आरोप आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचले आहे, हे जनतेला दिसत आहे, असे पाटील म्हणाले. या सरकारच्या कार्यकाळात मुंबईत दहशतवादी उजळ माथ्याने फिरत आहेत, परंतु सत्ताबळ वापरून या सरकारविरुद्ध बोलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप करतानाच महाराष्ट्रात लोकशाही संपली आहे का?, असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.
वाचा: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांचा भाजपवर निशाणा; म्हणाले…
महाराष्ट्रात जी आणीबाणी राज्य सरकारने लावली आहे, ती आता अधिकृतपणे घोषित करून टाका. सोशल मीडियावर काही लिहायचे नाही, महिलांवर अत्याचार झाले की मोर्चे काढायचे नाही, ही आणीबाणीच आहे, असेही पाटील यांनी सरकारला सुनावले. सरकारच्या दडपशाहीला भाजप घाबरत नाही, असे सांगताना अब्रू नुकसानीचा दावा करताना २५ टक्के स्टॅबिलिटी म्हणजे जवळपास २५ कोटी भरावे लागतील. आता एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी तुम्ही व्हाइट मनी कुठून आणणार? हाच व्हाइट मनी जमा करण्यासाठी हे लोक गावोगावी हिंडून वर्गणी गोळा करत आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनुसारच या सर्व तपास यंत्रणा कार्य करत आहेत, मात्र या सरकारला घटनादेखील मान्य नाही. केंद्राने सत्तेचा दुरुपयोग केला, अशी एकही घटना घडली नाही आणि तसे कधी न्यायालयानेही म्हटले नाही. अनिल देशमुख यांचा दावा चालवण्यासाठीही न्यायालय नकार देत आहे, असे पाटील म्हणाले. या देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करून १० लाख लोकांना तुरुंगात टाकले. मात्र भारत हा लोकशाही खऱ्या अर्थाने रुजलेला देश आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात इथे अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवले गेले. आमचा आवाज यांना आता दाबता येणार नाही, असेही पाटील यांनी ठणकावले.
वाचा: मुश्रीफांचा घोटाळा दाबण्यासाठी अटकेचे आदेश; सोमय्यांचा ठाकरे सरकारवर आरोप
Recover your password.
A password will be e-mailed to you.