तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ VS ‘मडगाव एक्सप्रेस’, पहिल्या दिवशी सिनेमांची झाली इतकी कमाई

0 35

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले दोन सिनेमे या आठवड्यात प्रदर्शित झाले. एक आहे रणदीप हुड्डाचा ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा, तर दुसरा आहे कुणाल खेमूचा ‘मडगाव एक्सप्रेस’. खरं तर दोन्ही सिनेमे वेगवेगळ्या धाटणीचे आहेत. पण या सिनेमाच्या कमाईसंदर्भात बोलायचं झालं तर दोन्ही सिनेमांनी फार विशेष काही कमाई केली नसल्याचं दिसून आलं.

रणदीप हु्ड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर, या सिनेमाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं आहे. सिनेमात त्यानं विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमात सावरकरांचं आयुष्य दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. तर बॉलिवूडचा सिनेमा म्हटल्यावर काहीशी ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ही घेण्यात आली आहे. काही प्रमाणात हा सिनेमा ‘प्रपोगंडा’ स्टाइल मांडणीही करतो, अशा प्रतिक्रियाही सोशल मीडियावर प्रेक्षकांनी दिल्या आहेत. या सिनेमात रणदीप सोबतच अंकिता लोखंडे, अमित सियाल, अपिंदरदीप सिंह यांच्याही भूमिका आहेत.
Video: पापाराझींवर चांगलीच भडकली अंकिता लोखंडे; कॅमेऱ्यासमोरच वैतागली- ‘तुम्ही इथून बाहेर जा…’

रणदीपच्या मेहनतीचं कौतुक

तर रणदीपनं या भूमिकेसाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुक प्रेक्षक करताना दिसतात. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भूमिका साकारण्यासाठी रणदीपनं घेतलेली मेहनत प्रत्येक प्रसंगात दिसून येतेय.

कमाई किती?
‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमाला फार मोठी ओपनिंग मिळावी नसल्याचं दिसून आलं. प्रचंड चर्चा, जोरदार प्रमोशन यानंतरही सिनेमानं पहिल्या दिवशी केवळ दीड कोटींचा गल्ला जमवला.

बजेट किती?
रणदीप हुड्डानं या सिनेमासाठी त्याचं घर विकल्याची चर्चा होती. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या सिनेमाचं बजेट हे २० कोटींच्या जवळपास असल्याचं म्हटलं जात आहे.
साराच्या ‘ए वतन मेरे वतन’वर झाली जोरदार टीका; अभिनेत्रीच्या आत्याने ट्रोल्सना सुनावले!
कुणाल खेमूचा ‘मडगाव एक्सप्रेस’
तर, दुसरीकडे कुणाल खेमू याचं लेखन आणि दिग्दर्शन असेलला मडगाव एक्सप्रेस हा सिनेमाही प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. कॉमेडी सिनेमा असल्याकारणानं तरुणाईला हा सिनेमा आवडताना दिसतोय. तसंच या सिनेमानंही दीड कोटींच्या घरात कमाई केल्याचं दिसून आलं. या सिनेमात अविनाश तिवारी, दिव्येंदू शर्मा, प्रतिक गांधी, उपेंद्र लिमये, छाया कदम, रेमो डिसूजा या कलाकारांच्या भूमिका आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.