Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बजेटच्या आकड्यांपासून दूर आहे ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची कमाई, आता मनसेनं केली वेगळीच मागणी

7

मुंबई: विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यावर आधारित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा सिनेमा २२ मार्च रोजी प्रदर्शित झाला. सिनेमाचं बजेट आणि प्रमोशन पाहता सिनेमाची कमाई अपेक्षेप्रमाणे झाली नसल्याचं आकड्यांवरून पाहायला मिळतंय. या सिनेमानं सात दिवसांत ११ कोटींची कमाई केली आहे.

रणदीप हुड्डाच्या या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपटानं प्रदर्शित झाला त्या दिवशी १.०५ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटानं २.२५ कोटींचा गल्ला जमवला होता.प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या रविवारी या चित्रपटानं २.६० कोटींचा गल्ला जमवला होता. तर पाचव्या दिवशी सिनेमाची कमाई घसरल्याचं पाहायला मिळाल होतं. पाचव्या दिवशी सिनेमानं १.१० कोटींचा गल्ला जमवला होता तर सिनेमाची एकूण कमाई ही ११. ३५ कोटींच्या जवळपास पोहोचली आहे. २० कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आलेल्या या सिनेमाचे आकडे समाधानकारक नसल्याचं म्हटलं जात आहे.

रणदीप हुड्डाच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ सिनेमाची पाच दिवसांत इतकीच कमाई, सोशल मीडियावर एकच चर्चा

रणदीप हुड्डा यानंच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय, तर निर्मिती झी स्टुडिओज, आनंद पंडित, संदीप सिंग, योगेश राहार यांनी केली आहे. रूपा पंडित, सॅम खान, अन्वर अली, पांचाली चक्रवर्ती हे या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटची कथा, पटकथा आणि संवाद उत्कर्ष नैथानी आणि रणदीप हुड्डा यानं लिहिले आहेत.या चित्रपटात अंकिता लोखंडे हिनं सावरकर यांच्या पत्नीची अर्थात यमुनाबाईंची भूमिका साकारली आहे. या भूमिकेबद्दल बोलताना अंकिता म्हणाली की, यमुनाबाई या एक सशक्त महिला होत्या. त्यांची भूमिका साकारल्याचा आनंद आहे.

वाढदिवसाचं स्पेशल गिफ्ट; अभिनेता रणदीप रायच्या हाती आयकॉनिक अवॉर्ड

यशाच्या शिखरावर असताना अमृता खानविलकरने घेतला वेगळा ध्यास; पाहा ‘चंद्रमुखी’ कशाचे धडे घेणार?
मनसेची मागणी
दरम्यान, मनसे नेते व प्रसिद्ध चित्रपट निर्माते अमेय खोपकर यांनी हा सिनेमा करमुक्त करावा, अशीही मागणी केली आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं बलिदान, देशासाठी त्यांनी केलेला संघर्ष हा सर्वसामान्य प्रेक्षक तसंच सध्याच्या युवापिढीसाठी आदर्श ठरेल असाच आहे. यासाठी रणदीप हुडा दिग्दर्शित ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोचणं गरजेचं आहे. म्हणूनच राज्य सरकारकडे आमची मागणी आहे की हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट राज्यात करमुक्त करण्यात यावा. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यापासून आजच्या पिढीला प्रेरणा मिळाली तर आजच्या काळातही देशासाठी ते मोठं योगदान ठरु शकतं’, असं त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.