Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या कायद्यांतर्गत पंचायत स्तरावरील समित्यांना अलाप्पुझा येथील सर्व पंचायतींमध्ये तातडीने बैठका घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवालानुसार, बर्ड फ्लूचे केंद्रबिंदू असलेल्या एडथुआ आणि चेरुथनामध्ये जवळपास २१ हजार बदकं मारली जाणार आहेत. याव्यतिरिक्त, प्रादुर्भाव क्षेत्राच्या एक किलोमीटरच्या परिसरात सर्व पाळीव पक्षी मारले जातील.
आजूबाजूच्या पंचायती आणि नगरपालिका निरीक्षणाखाली आहेत. तसंच जिल्हा स्तरावर निरीक्षण केलं जावं आणि प्रगती अहवाल राज्य स्तरावर नोंदवावा. सर्व जिल्ह्यांमध्ये ‘वन हेल्थ’ समित्या मजबूत करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आरोग्य मंत्रालयानुसार, बर्ड फ्लूचा राज्यातील माणसांवर अद्याप कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र, त्याचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. सर्वांनी आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. विभाग प्रभावित भागात ताप आणि इतर लक्षणांवर लक्ष ठेवत आहे. या भागातील लोकांना श्वसनाचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
एवियन इन्फ्लूएंजा (H5N1) काय आहे?
हा अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य संसर्ग असून जो प्रामुख्याने पक्ष्यांना प्रभावित करतो. बर्ड फ्लू लोकांमध्ये दुर्मिळ आहे, परंतु यामुळे गंभीर आजार होऊ शकतो.
काय काळजी घ्याल?
– हा रोग कोंबडी, बदक, लहान पक्षी, हंस, टर्की यांसारख्या पक्ष्यांना प्रभावित करू शकतो.
– संक्रमित पक्ष्यांच्या जवळ असणारे लोक पक्षी पाळणारे, पाळीव पक्ष्यांच्या संपर्कात असलेली मुलं, गृहिणी, पशुवैद्य आणि इतर संबंधित कर्मचारी यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
काय आहेत बर्ड फ्लूची लक्षणं?
– अंगदुखी
– ताप
– खोकला
– श्वास घेण्यास त्रास
– थंडी वाजणं
रोग प्रतिबंधक उपायांव्यतिरिक्त, जे संशयित संक्रमित पक्षी हाताळतात त्यांनी हातमोजे आणि चेहरा झाकणे आवश्यक आहे. आपले हात साबण आणि पाण्याने वारंवार धुवावेत. फक्त चांगले शिजवलेले मांस आणि अंडी खावीत. कोणताही मृत किंवा आजारी पक्षी प्राणी कल्याण विभाग किंवा स्थानिक शासकीय विभागाला कळवावा.