
Tej Police Times
चैत्रात सूर्य आग ओकत आहे. संपूर्ण गुजरात भडभुंज्या लाह्यासारखा भाजून निघत आहे. पानगळी वृक्षांना चैत्रात एकदाच नवी पालवी फुटते. इंडिया आघाडी निवडणुकीच्या राजकारणातलं पानगळी वृक्ष झाला आहे. ‘आप’च्या उमेदवाराने जे आव्हान भाजपसमोर निर्माण केले आहे, त्यावरून ‘चैतर’पालवीची इंडियाला प्रचंड अपेक्षा आहेत.
काँग्रेसच्या चाणक्याची कर्मभूमी असलेला भरूच लोकसभा मतदारसंघ आता भगवा झाला आहे. या मतदारसंघातून १९९९ पासून भाजपचे मनसुख वसावा तब्बल सहा वेळा विजयी झाले आहेत. यंदाची त्यांची सातवी टर्म. मात्र, या वेळी त्यांना ‘आप’चे तरुण आदिवासी उमेदवार चैतर वसावा यांचे आव्हान आहे, तर दिग्गज आदिवासी नेते छोटूलाल वसावा यांचे पुत्र दिलीप वसावा यांनी भारत आदिवासी पक्षाकडून (बीएपी) उमेदवारी अर्ज भरल्याने या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. पाणी, शेती आणि महागाई या तीन मुद्द्यांभोवती फिरणाऱ्या या निवडणुकीत खरी लढत मनसुख वसावा विरुद्ध चैतर वसावा यांच्यातच आहे.
शिंदे यांची सरशी; महायुतीच्या जागावाटपात भाजपकडून १५ जागा मिळवण्यात यश, पालघरचा तिढा कायम
– भरूच लोकसभा मतदारसंघात झगडिया, डेडियापाडा, अंकलेश्वर, भरूच, जंबुसर, वाघरा आणि कर्जन हे सात विधानसभा मतदारसंघ आहेत.
– सहा भाजपचे, तर एक ‘आप’चा आमदार आहे. तो म्हणजे चैतर वसावा. ते डेडियापाडा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
– दबंग आदिवासी म्हणून चैतर वसावा यांची ओळख आहे. त्यांच्यावर १३ गुन्हे, तर दिलीप वसावा यांच्यावर एक गुन्हा दाखल
– आदिवासीबहुल मतदारसंघ असला तरी तो खुल्या गटात, जातीय समीकरणांमुळे या वेळी ही लढत आदिवासींमध्येच रंगणार
Recover your password.
A password will be e-mailed to you.