
Tej Police Times
पूर्णा नदी वरील नांदगावजवळ असलेल्या राहाटीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. रात्री नऊ वाजल्यापासूनच राहटी पुलावरून पाणी वाहने सुरू झाले होते. त्यामुळे परभणी नांदेड वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. याची दक्षता घेत जिल्हा प्रशासनाकडून हा महामार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मोबाईलच्या आहारी गेलेल्या १६ वर्षीय युवकाचा धक्कादायक प्रकार, पालकांनाही विश्वास बसेना
साल २००६ साली, परभणी जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती आणि त्यावेळी येलदरी धरण आणि सिद्धेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. तेव्हा तब्बल तीन दिवसासाठी राहाटी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कधी राहटी पुलावरून पाणी गेल्याचं दिसून आलं नाही.
यंदा मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने पूर्ण क्षमतेने भरलेल्या प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने तब्बल सोळा वर्षानंतर परत एकदा परभणी-नांदेड वाहतूक ही बंद करण्यात आली आहे.
कुत्र्याचा पाठलाग करत थेट किचनमध्ये शिरला बिबट्या, घरात होते १० जण; पुढे जे झालं ते वाचून हादराल
Recover your password.
A password will be e-mailed to you.