
Tej Police Times
काँग्रेसचे रायबरेलीतील उमेदवार आणि बंधू राहुल गांधी यांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत प्रियांका गांधी-वद्रा यांनी रविवारी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. मोदींनी देशाचा सर्व पैसा केवळ चार ते पाच श्रीमंतांना वाटला, असा आरोप त्यांनी केला. ‘खाजगीकरण वाईट नाही; पण पंतप्रधानांनी देशाची संपूर्ण संपत्ती चार-पाच श्रीमंतांना दिली तर ते अयोग्यच आहे. आज देशातील कोळसा, वीज, बंदरे, विमानतळ सर्व काही पंतप्रधानांच्या मित्रांकडे आहे,’ असे प्रियांका म्हणाल्या.
Recover your password.
A password will be e-mailed to you.