
Tej Police Times
‘भाजपला राज्यघटना नष्ट करायची आहे. तसेच आदिवासी, दलित आणि मागासवर्गीयांना देण्यात आलेले आरक्षण रद्द करायचे आहे’, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ओडिशामधील बोलनगीर येथील प्रचारसभेत ते बोलत होते. ‘भाजपने ही निवडणूक जिंकली तर सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण केले जाईल आणि देश केवळ २२ अब्जाधीश चालवतील’, असेही राहुल यावेळी म्हणाले.
निवडणुकीत धार्मिक मुद्दा उपस्थित करून भाजप नागरिकांचे लक्ष दुसरीकडे वळवत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी बुधवारी केला. ‘धर्माच्या नावावर तुम्हाला फसवून ते सत्तेवर येऊ शकतात, हे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आले आहे. नागरिकांसाठी काम करण्याची गरज नाही असे अगदी नरेंद्र मोदींपासून ते रायबरेलीतील भाजपच्या उमेदवारापर्यंत सर्वच भाजप नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच निवडणुकीवेळी धर्माच्या नावावर ते तुमचे लक्ष अन्यत्र वळवतात’, असे प्रियांका म्हणाल्या.
Recover your password.
A password will be e-mailed to you.